नुकतीच राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाच्या (NFHS-5 )दुसऱ्या टप्प्यातली आकडेवारी जाहीर झाली आहे. पहिल्या टप्प्यातली आकडेवारी डिसेंबर मध्ये जाहीर झाली होती. आता देशभरातील आकडेवारीत प्रथमच पुरुषांपेक्षा स्त्रियांची संख्या जास्त असल्याचे दिसून येते आहे. म्हणून अनेक ठिकाणी कौतुकाच्या बातम्या येत आहेत. स्त्रियांची संख्या वाढली हे चांगलेच आहे पण त्या निरोगी आहेत का? जर याच NFHS-5 मधली स्त्रिया आणि मुलांमधील अॅनिमियाचे वाढलेले प्रमाण बघून निराशा पदरी येण्याची शक्यता आहे. कारण 2015-16 मध्ये झालेल्या NFHS-4 नुसार 15 ते 49 या वयोगटातल्या स्त्रियांमध्ये 54% स्त्रिया अॅनिमिक होत्या, ते प्रमाण वाढून आता 58.7% इतकं झालं आहे. याच वयोगटातल्या पुरुषांमध्ये अॅनिमियाचे प्रमाण 25% आहे. भारतात सगळीकडे पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये एनिमियाचे प्रमाण जास्त असते. गेल्या काही वर्षांपासून “अॅनिमिया मुक्त भारत” सारख्या योजना राबवल्या जात असूनदेखील स्त्रिया, पुरुष आणि मुलं या सर्वांमध्ये अॅनिमियाचे प्रमाण वाढत चालले आहे!
मी इंटर्नशिप करत असताना KEM हॉस्पिटलमध्ये एका गरोदर मुलीला अॅडमिट करून तिच्या टेस्ट करून घेण्याचे काम मला दिले होते. तिचे हिमोग्लोबिन फक्त 4 होते; तो रिपोर्ट बघून मी चक्रावले. मी मॅडमना विचारले की ही घरात कशी काय काम करत असेल ? तर त्या म्हणाल्या,’ 2 हिमोग्लोबिन असलेल्या बाया पण येतात. त्यामानाने,चार तर जास्तच आहे!’
अॅनिमिया ही भारतीय स्त्रियांची ओळखच आहे म्हणाना! मी अठरा वर्षांची झाले तेव्हा माझे हिमोग्लोबिन 10 असूनही माझे रक्त घेतले होते. कारण तेव्हा भारतीय महिलांचे हिमोग्लोबिन 10 म्हणजे नॉर्मल मानले जायचे. आता मात्र रक्तदानासाठी स्त्रियांचेही हिमोग्लोबिन कमीत कमी12.5 ग्राम असावे लागते. हीच रेंज पुरुषांसाठी 13 ते 17 आहे. हिमोग्लोबिन हे रक्तातील तांबड्या पेशींमध्ये असते. हिमोग्लोबिन ची पातळी स्त्रियांमध्ये 11.5 ग्रॅम आणि पुरुषांमधे 13 पेक्षा कमी असेल तर अॅनिमिया झाला असे म्हणतात. अनेकदा स्त्रियांमध्ये 10 च्या वर हिमोग्लोबिन बघायला मिळत नाही.
हिमोग्लोबिन हा रेणू हिम आणि ग्लोबिन अश्या दोन भागांचा बनलेला असतो. हिम हा लोह असलेला रेणू आहे. तर ग्लोबिन हे एक प्रोटीन आहे. हिमोग्लोबिन च्या एका रेणुमध्ये एक लोहाचा अणू असतो, तो हिम नावाची रिंग तयार करतो आणि त्या रिंगला ग्लोबिनच्या 4 साखळ्या जोडलेल्या असतात. ह्यावरून हे समजून येईल की हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी लोह आणि प्रथिने आहारात असणे अत्यावश्यक आहे. आपण हवेतून घेतलेला ऑक्सिजन रक्तातल्या हिमोग्लोबिनशी संयोग पावून ऑक्सिहिमोग्लोबिन तयार करतो. हे रक्त जेव्हा अवयवांच्या पेशींमध्ये जाते तेव्हा ऑक्सिजन सुट्टा होऊन तो पेशींना मिळतो. पेशी कार्बन डाय ऑक्साईड तयार करतात. तो रक्तातील प्लाझ्मा मध्ये विरघळतो आणि फुप्फुसांमार्फत बाहेर टाकला जातो. जर हिमोग्लोबिन कमी असेल तर पेशींना ऑक्सिजन मिळत नाही आणि त्या नष्ट होऊ लागतात. मोठ्या प्रमाणावर पेशी नष्ट झाल्यास थकवा येणे, सूज येणे, वेगवेगळ्या अवयवांचे कार्य कमी होणे अश्या अनेक गोष्टी घडतात. बरेचदा ह्याचे कारण अन्नातून पुरेसे लोह किंवा प्रोटीन न मिळणे हे असते. मात्र काही बाबतीत आतड्यातील रक्तस्त्राव आणि जंत हे कारणदेखील असू शकते. तसेच आहारातील लोह रक्तात शोषले जाण्यासाठी व्हिटॅमिन C ची आवश्यकता असते. आणखी व्हिटॅमिन B12 आणि फॉलीक ऍसिडची कमतरता हेही कारण असते.
ज्यात शरीराच्या पेशींना ऑक्सिजन मिळत नाही अशा वेगवेगळ्या आजारांचे अॅनिमिया एक लक्षण आहे.. कारण शोधून त्याला औषध द्यावे लागते. किडनीचे रोग, जंत, लोह, व्हिटॅमिन 12 फोलेट ची कमतरता, काही आनुवंशिक आजार, इन्फेक्शन्स, hiv, पाईल्स, रक्ताचा कॅन्सर, टीबी अशा वेगवेगळ्या आजारांत अॅनिमिया हा एक भाग असतो.
मी इंटर्नशिप करत असताना KEM हॉस्पिटलमध्ये एका गरोदर मुलीला अॅडमिट करून तिच्या टेस्ट करून घेण्याचे काम मला दिले होते. तिचे हिमोग्लोबिन फक्त 4 होते; तो रिपोर्ट बघून मी चक्रावले. मी मॅडमना विचारले की ही घरात कशी काय काम करत असेल ? तर त्या म्हणाल्या,’ 2 हिमोग्लोबिन असलेल्या बाया पण येतात. त्यामानाने,चार तर जास्तच आहे!’
अॅनिमिया ही भारतीय स्त्रियांची ओळखच आहे म्हणाना! मी अठरा वर्षांची झाले तेव्हा माझे हिमोग्लोबिन 10 असूनही माझे रक्त घेतले होते. कारण तेव्हा भारतीय महिलांचे हिमोग्लोबिन 10 म्हणजे नॉर्मल मानले जायचे. आता मात्र रक्तदानासाठी स्त्रियांचेही हिमोग्लोबिन कमीत कमी12.5 ग्राम असावे लागते. हीच रेंज पुरुषांसाठी 13 ते 17 आहे. हिमोग्लोबिन हे रक्तातील तांबड्या पेशींमध्ये असते. हिमोग्लोबिन ची पातळी स्त्रियांमध्ये 11.5 ग्रॅम आणि पुरुषांमधे 13 पेक्षा कमी असेल तर अॅनिमिया झाला असे म्हणतात. अनेकदा स्त्रियांमध्ये 10 च्या वर हिमोग्लोबिन बघायला मिळत नाही.
हिमोग्लोबिन हा रेणू हिम आणि ग्लोबिन अश्या दोन भागांचा बनलेला असतो. हिम हा लोह असलेला रेणू आहे. तर ग्लोबिन हे एक प्रोटीन आहे. हिमोग्लोबिन च्या एका रेणुमध्ये एक लोहाचा अणू असतो, तो हिम नावाची रिंग तयार करतो आणि त्या रिंगला ग्लोबिनच्या 4 साखळ्या जोडलेल्या असतात. ह्यावरून हे समजून येईल की हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी लोह आणि प्रथिने आहारात असणे अत्यावश्यक आहे. आपण हवेतून घेतलेला ऑक्सिजन रक्तातल्या हिमोग्लोबिनशी संयोग पावून ऑक्सिहिमोग्लोबिन तयार करतो. हे रक्त जेव्हा अवयवांच्या पेशींमध्ये जाते तेव्हा ऑक्सिजन सुट्टा होऊन तो पेशींना मिळतो. पेशी कार्बन डाय ऑक्साईड तयार करतात. तो रक्तातील प्लाझ्मा मध्ये विरघळतो आणि फुप्फुसांमार्फत बाहेर टाकला जातो. जर हिमोग्लोबिन कमी असेल तर पेशींना ऑक्सिजन मिळत नाही आणि त्या नष्ट होऊ लागतात. मोठ्या प्रमाणावर पेशी नष्ट झाल्यास थकवा येणे, सूज येणे, वेगवेगळ्या अवयवांचे कार्य कमी होणे अश्या अनेक गोष्टी घडतात. बरेचदा ह्याचे कारण अन्नातून पुरेसे लोह किंवा प्रोटीन न मिळणे हे असते. मात्र काही बाबतीत आतड्यातील रक्तस्त्राव आणि जंत हे कारणदेखील असू शकते. तसेच आहारातील लोह रक्तात शोषले जाण्यासाठी व्हिटॅमिन C ची आवश्यकता असते. आणखी व्हिटॅमिन B12 आणि फॉलीक ऍसिडची कमतरता हेही कारण असते.
ज्यात शरीराच्या पेशींना ऑक्सिजन मिळत नाही अशा वेगवेगळ्या आजारांचे अॅनिमिया एक लक्षण आहे.. कारण शोधून त्याला औषध द्यावे लागते. किडनीचे रोग, जंत, लोह, व्हिटॅमिन 12 फोलेट ची कमतरता, काही आनुवंशिक आजार, इन्फेक्शन्स, hiv, पाईल्स, रक्ताचा कॅन्सर, टीबी अशा वेगवेगळ्या आजारांत अॅनिमिया हा एक भाग असतो.
अॅनिमियाची लक्षणे
1 चक्कर येणे
2 हृदयाची गती वाढणे, पायांना सूज येणे
3 डोकेदुखी
4 छाती, पोट, हाडे, सांधे दुखणे
5 मुलांची वाढ नीट न होणे
6 त्वचा पांढरट दिसणे
7 खूप थकवा येणे, अशक्तपणा
रक्तातील पेशी ह्या अस्थीमज्जेत तयार होतात. तांबड्या पेशींचे आयुष्य 120 दिवसांचे असते. जुनाट तांबड्या पेशी प्लिहा किंवा स्प्लिन मध्ये नष्ट केल्या जातात आणि त्यातील लोह पुन्हा अस्थीमज्जेत येते तर ग्लोबिन साखळ्यांपासून बिलिरुबिन बनते. हे लक्षात घेतले तर अॅनिमिया होण्याची कारणे आपल्याला सहज समजतील.
1 तांबड्या पेशी किंवा हिमोग्लोबिन तयार न होणे
2 खूप जास्त रक्तस्त्राव
3 तांबड्या पेशी रक्तवाहिन्यांमध्येच नष्ट केल्या जाणे
1 तांबड्या पेशी किंवा हिमोग्लोबिन तयार न होणे- ह्याची अनेक कारणे आहेत.
रक्तमज्जेत तांबड्या पेशी तयारच न होणे- हे बरेचदा जेनेटिक किंवा औषधांचा दुष्परिणाम म्हणून होते. पण
स्त्रियांमधील मुख्य कारण म्हणजे आहारात लोह, प्रोटीन आणि जीवनसत्वांची कमतरता.
भारतात अजूनही मुलींना सकस अन्न दिले जात नाही हे मुख्य कारण आहे. घरात आधी पुरुषांना वाढून मग उरले सुरले बायकानी खाण्याची पद्धत आहे. मांसाहारी कुटुंबातही पुरुषांना मासे किंवा मटण आधी दिले जाते. स्त्रिया फक्त रस्सा खातात. ह्या सर्व कारणांनी स्त्रियांमध्ये अॅनिमिया असतोच. सधन घरातील स्त्रियांना अशी कमतरता निर्माण होण्याचे कारण म्हणजे स्त्रियांच्या खाण्याच्या आवडी निवडी, डाएट म्हणून खूप कमी खाणे, उपासतापास हे आहे.
गरोदरपणात स्त्रीने स्वतः आणि मूल ह्या दोघांना पुरेल इतके लोह, प्रथिन आणि कॅल्शियम घेतले पाहिजे. गरोदर पणी अॅनिमिया झाल्यामुळे आईच्या मृत्यूचा धोका दुप्पट वाढतो आणि बाळाच्या वाढीवर देखील विपरीत परिणाम होतो. ह्यासाठी गरोदरपणात सर्वच स्त्रियांना लोह, व्हिटॅमिन B12, फोलीक ऍसिड आणि कॅल्शियम ह्या गोळ्या दिल्या जातात. सरकारी हॉस्पिटलमध्ये त्या फुकट दिल्या जातात. तरीही स्त्रिया त्या घेण्याची टाळाटाळ करतात. गोळ्यांनी मूल खूप मोठे होते आणि डिलिव्हरी नीट होत नाही, लोहामुळे बद्धकोष्ठता होते अशा समजुती असतात. शेवटी डिलिव्हरीच्या वेळी हिमोग्लोबिन अतिशय कमी असते आणि त्यावेळी रक्तस्त्राव होतोच मग रक्त चढवावे लागते. कुटुंबातील लोक आधी स्त्रीकडे दुर्लक्ष करतात आणि शेवटी ब्लड बँकेच्या कर्मचाऱ्यांवर रक्त देण्यासाठी दबाव आणतात. त्यावेळी रक्त दिलेच पाहिजे असा नियम आहे. मात्र आधीपासून हिमोग्लोबिन ची पातळी नीट असल्यास ही वेळच येणार नाही हे ते सोयीस्करपणे विसरतात.
2 रक्तस्त्राव
खूप जणींना पाळीच्या वेळी मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होतो. गर्भाशयातील फायब्रोईड, गर्भाशयाच्या आवरणाची अनियमित वाढ ही नेहमीची कारणे झाली. तसेच लघवी किंवा शौचातूनही रक्तस्त्राव होऊन अॅनिमिया होऊ शकतो. त्यामुळे ह्यासाठी लौकर ट्रीटमेंट घेणे गरजेचे आहे.
3 रक्तपेशी रक्तवाहिन्यांतच नष्ट होणे
थॅलेसेमिया, सिकल सेल डिजीज हे जेनेटिक आजार आहेत. मात्र हे लहानपणीच समजतात. थॅलेसेमियामध्ये रक्त देणे हाच उपाय आहे तर सिकल सेल डिजीज मध्ये मूल मृत्युमुखी पडण्याची शक्यता असते.
अॅनिमियाचे निदान करण्यासाठी हिमोग्लोबिन आणि RBC लेव्हल तपासली जाते. तसंच युरिन, स्टूल ह्यांचेही परीक्षण केले जाते. रक्तातील लोह, व्हिटॅमिन B12, फॉलिक अॅसिड ची पातळी सुद्धा तपासली जाते.
यावर उपचार म्हणून लोह किंवा व्हिटॅमिनची कमतरता असेल तर त्यानुसार गोळ्या किंवा इंजेक्शन देतात.
रक्तस्त्राव कोणत्या कारणाने होतोय हे शोधून त्यावर उपचार करतात.
अॅनिमिया होऊच नये म्हणून काय केले पाहिजे?
स्त्रियांनी आपल्या शरीराकडे लक्ष देणे आवश्यक आहे. वजन कमी करण्यासाठी किंवा व्रत म्हणून उपाशी राहणे टाळले पाहिजे. मूल होऊ द्यावे की नाही हा निर्णय स्त्रीचा असला पाहिजे. कारण मूल आपल्याला हवी ती पोषक द्रव्ये आईकडून शोषून घेते. ह्यात मुख्यतः कॅल्शियम आईच्या हाडांतून शोषले जाते. त्यामुळे प्रेग्नन्सी सुरू होताना आपले हिमोग्लोबिन आणि कॅल्शिअमची पातळी नॉर्मल असली पाहिजे यांची काळजी घ्यायला हवी. आणि ती नॉर्मल असली तरीही प्रेग्नन्सी आणि मुलाला दूध पाजत असेपर्यंत लोह, व्हिटॅमिन B12 आणि फॉलिक ऍसिड च्या गोळ्या घेतल्या पाहिजेत. आहारात हिरव्या पालेभाज्या, गूळ, मासे, वगैरे असले पाहिजेत. मुलीच्या आहाराकडे लक्ष दिले पाहिजे. या वैयक्तिक काळजी सोबतच समाजातले स्त्रियांचे स्थान उंचावणे, त्यांच्यासाठी शिक्षणाची आणि आरोग्य सुविधांची उपलब्धता असणे – यामुळे देखील अॅनिमियाचे प्रमाण कमी होऊ शकते – असे विविध अभ्यासातून दिसून आले आहे.
1 चक्कर येणे
2 हृदयाची गती वाढणे, पायांना सूज येणे
3 डोकेदुखी
4 छाती, पोट, हाडे, सांधे दुखणे
5 मुलांची वाढ नीट न होणे
6 त्वचा पांढरट दिसणे
7 खूप थकवा येणे, अशक्तपणा
रक्तातील पेशी ह्या अस्थीमज्जेत तयार होतात. तांबड्या पेशींचे आयुष्य 120 दिवसांचे असते. जुनाट तांबड्या पेशी प्लिहा किंवा स्प्लिन मध्ये नष्ट केल्या जातात आणि त्यातील लोह पुन्हा अस्थीमज्जेत येते तर ग्लोबिन साखळ्यांपासून बिलिरुबिन बनते. हे लक्षात घेतले तर अॅनिमिया होण्याची कारणे आपल्याला सहज समजतील.
1 तांबड्या पेशी किंवा हिमोग्लोबिन तयार न होणे
2 खूप जास्त रक्तस्त्राव
3 तांबड्या पेशी रक्तवाहिन्यांमध्येच नष्ट केल्या जाणे
1 तांबड्या पेशी किंवा हिमोग्लोबिन तयार न होणे- ह्याची अनेक कारणे आहेत.
रक्तमज्जेत तांबड्या पेशी तयारच न होणे- हे बरेचदा जेनेटिक किंवा औषधांचा दुष्परिणाम म्हणून होते. पण
स्त्रियांमधील मुख्य कारण म्हणजे आहारात लोह, प्रोटीन आणि जीवनसत्वांची कमतरता.
भारतात अजूनही मुलींना सकस अन्न दिले जात नाही हे मुख्य कारण आहे. घरात आधी पुरुषांना वाढून मग उरले सुरले बायकानी खाण्याची पद्धत आहे. मांसाहारी कुटुंबातही पुरुषांना मासे किंवा मटण आधी दिले जाते. स्त्रिया फक्त रस्सा खातात. ह्या सर्व कारणांनी स्त्रियांमध्ये अॅनिमिया असतोच. सधन घरातील स्त्रियांना अशी कमतरता निर्माण होण्याचे कारण म्हणजे स्त्रियांच्या खाण्याच्या आवडी निवडी, डाएट म्हणून खूप कमी खाणे, उपासतापास हे आहे.
गरोदरपणात स्त्रीने स्वतः आणि मूल ह्या दोघांना पुरेल इतके लोह, प्रथिन आणि कॅल्शियम घेतले पाहिजे. गरोदर पणी अॅनिमिया झाल्यामुळे आईच्या मृत्यूचा धोका दुप्पट वाढतो आणि बाळाच्या वाढीवर देखील विपरीत परिणाम होतो. ह्यासाठी गरोदरपणात सर्वच स्त्रियांना लोह, व्हिटॅमिन B12, फोलीक ऍसिड आणि कॅल्शियम ह्या गोळ्या दिल्या जातात. सरकारी हॉस्पिटलमध्ये त्या फुकट दिल्या जातात. तरीही स्त्रिया त्या घेण्याची टाळाटाळ करतात. गोळ्यांनी मूल खूप मोठे होते आणि डिलिव्हरी नीट होत नाही, लोहामुळे बद्धकोष्ठता होते अशा समजुती असतात. शेवटी डिलिव्हरीच्या वेळी हिमोग्लोबिन अतिशय कमी असते आणि त्यावेळी रक्तस्त्राव होतोच मग रक्त चढवावे लागते. कुटुंबातील लोक आधी स्त्रीकडे दुर्लक्ष करतात आणि शेवटी ब्लड बँकेच्या कर्मचाऱ्यांवर रक्त देण्यासाठी दबाव आणतात. त्यावेळी रक्त दिलेच पाहिजे असा नियम आहे. मात्र आधीपासून हिमोग्लोबिन ची पातळी नीट असल्यास ही वेळच येणार नाही हे ते सोयीस्करपणे विसरतात.
2 रक्तस्त्राव
खूप जणींना पाळीच्या वेळी मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होतो. गर्भाशयातील फायब्रोईड, गर्भाशयाच्या आवरणाची अनियमित वाढ ही नेहमीची कारणे झाली. तसेच लघवी किंवा शौचातूनही रक्तस्त्राव होऊन अॅनिमिया होऊ शकतो. त्यामुळे ह्यासाठी लौकर ट्रीटमेंट घेणे गरजेचे आहे.
3 रक्तपेशी रक्तवाहिन्यांतच नष्ट होणे
थॅलेसेमिया, सिकल सेल डिजीज हे जेनेटिक आजार आहेत. मात्र हे लहानपणीच समजतात. थॅलेसेमियामध्ये रक्त देणे हाच उपाय आहे तर सिकल सेल डिजीज मध्ये मूल मृत्युमुखी पडण्याची शक्यता असते.
अॅनिमियाचे निदान करण्यासाठी हिमोग्लोबिन आणि RBC लेव्हल तपासली जाते. तसंच युरिन, स्टूल ह्यांचेही परीक्षण केले जाते. रक्तातील लोह, व्हिटॅमिन B12, फॉलिक अॅसिड ची पातळी सुद्धा तपासली जाते.
यावर उपचार म्हणून लोह किंवा व्हिटॅमिनची कमतरता असेल तर त्यानुसार गोळ्या किंवा इंजेक्शन देतात.
रक्तस्त्राव कोणत्या कारणाने होतोय हे शोधून त्यावर उपचार करतात.
अॅनिमिया होऊच नये म्हणून काय केले पाहिजे?
स्त्रियांनी आपल्या शरीराकडे लक्ष देणे आवश्यक आहे. वजन कमी करण्यासाठी किंवा व्रत म्हणून उपाशी राहणे टाळले पाहिजे. मूल होऊ द्यावे की नाही हा निर्णय स्त्रीचा असला पाहिजे. कारण मूल आपल्याला हवी ती पोषक द्रव्ये आईकडून शोषून घेते. ह्यात मुख्यतः कॅल्शियम आईच्या हाडांतून शोषले जाते. त्यामुळे प्रेग्नन्सी सुरू होताना आपले हिमोग्लोबिन आणि कॅल्शिअमची पातळी नॉर्मल असली पाहिजे यांची काळजी घ्यायला हवी. आणि ती नॉर्मल असली तरीही प्रेग्नन्सी आणि मुलाला दूध पाजत असेपर्यंत लोह, व्हिटॅमिन B12 आणि फॉलिक ऍसिड च्या गोळ्या घेतल्या पाहिजेत. आहारात हिरव्या पालेभाज्या, गूळ, मासे, वगैरे असले पाहिजेत. मुलीच्या आहाराकडे लक्ष दिले पाहिजे. या वैयक्तिक काळजी सोबतच समाजातले स्त्रियांचे स्थान उंचावणे, त्यांच्यासाठी शिक्षणाची आणि आरोग्य सुविधांची उपलब्धता असणे – यामुळे देखील अॅनिमियाचे प्रमाण कमी होऊ शकते – असे विविध अभ्यासातून दिसून आले आहे.
डॉ मंजिरी मणेरीकर