एक आटपाट नगर होतं,नगरात राहत होत्या अनेक नारी,त्यांची सदानकदा धावपळ भारी. त्या उठत पहाटेच्या प्रहरी, सगळ्यांसाठी करून ठेवत न्याहारी.
स्वत:ला मात्र न्याहारीला वेळ मिळत नसे, घरकामांचा मोठा डोंगर दिसे.
त्या घरातच करत सगळी कामं, तरी लोक त्यांना ठरवत रिकामं.
त्या घरातच करत सगळी कामं, तरी लोक त्यांना ठरवत रिकामं.
रोज शिजवलेलं साधं अन्न,हेच त्यांना वाटे पक्वान्न.
पण तेही ताजं मिळायची मारामारी, कारण बाकीच्या सगळ्यांचे नखरे भारी.
बाईला खावं लागे शिळंपाकं, कारण उरलेल्या अन्नाला सगळे मुरडायचे नाकं.
रोज उठून ती सगळ्यांच्या भुकेपुरतंच अन्न शिजवे, पण घरच्या पुरुषांचे आणि मुलांचे एकेक नखरे नवे.
त्यामुळे घरी शिजवलेले अन्न उरायचं आणि शिळं होऊन तिच्या ताटात पडायचं.
कधी अचानक घरी पाहुणे येत आणि त्यांच्यासाठी नवा स्वयंपाक करावा लागे.
स्वत:ची भूक बाजूला सारून ,बाईला त्यांना वाढावे लागे.
कधी अन्न वाया जाऊ नये म्हणून, अन्नाचा अपमान होऊ नये म्हणून, माऊली शिळं अन्न खाई.
तर कधी सर्वांना पोटभर मिळावे म्हणून ती उपाशी राही .
घरोघरी रोज बाईच्या खाण्याची आबाळ होऊ लागली, तिची तब्येत बिघडू लागली.
घरोघरी रोज बाईच्या खाण्याची आबाळ होऊ लागली, तिची तब्येत बिघडू लागली.
शरीराला पोषण कमी पडू लागलं. तिचं वजन कमी होऊ लागलं,तिचं डोकं दुखू लागलं.
ती थोड्याशा कामानं दमू लागली. तिच्या चेहऱ्याची रया गेली, ती उठता बसता थकू लागली.
पुरुषांना कळेना ह्या बायांना झालं काय ? ते बायांवर ओरडू लागले, कामचुकार म्हणू लागले. कोणी त्यांना डॉक्टरकडे नेलं, कोणी बुवाकडे नेलं, कोणी बाईकडे नेलं. कोणाला वाटलं देवाचं काहीतरी राहिलं, म्हणून त्यांनी काराण घातलं, कोणी दान केलं, लोकांना जेवू घातलं. पण बायांच्या तब्येतीत फरक पडेना. काय करावं काही कळेना.
एके दिवशी नवल घडले. एक घर असे दिसले,
एके दिवशी नवल घडले. एक घर असे दिसले,
जिथे बाया आजारी नव्हत्या. त्या हसतखेळत काम करत होत्या.
हे असं कसं झालं ? हे घर कोणाचं?म्हणून काहीजण त्या घरात गेले.
हे असं कसं झालं ? हे घर कोणाचं?म्हणून काहीजण त्या घरात गेले.
तिथं होती सावित्री माय. ती म्हणाली, “बाबांनो तुमचा चेहरा असा का पडला? असा कोणता प्रसंग घडला.”
“माय माय, आमच्यावर धर मायेची साय आणि सांग आम्हांला तुझी राय”
“मला कळेल असं बोला,सापडेल तुमच्या दुखण्यावर उतारा”
“आमच्या सगळ्यांच्या घरातल्या बायांना काहीनाकाही आजार आहेत ,पण तुझ्या लेकीसुना मात्र खुशाल आहेत. ही कुठली जादू आहे? ते आम्हाला सांग.”
सावित्रीमाय म्हणाली, “जादू नाही, काही नाही. आम्हीही या गावचंच पितो पाणी,पण आमच्या घरची वेगळी आहे कहाणी. आम्ही ताज्या दशमीचा वसा घेतला आहे! ”
“माय माय, आम्हाला तुझा वसा सांग, आमच्या बायकामुली फेडतील पांग”
“बाबानो हा वसा लेकी-सुनांसाठी,आपल्या माय-बहिणीसाठी, सखीसजणीसाठी पुरुषांनी घ्यायचा आहे.”
“हे तू काय विपरीत बोलतेस माय? वसा वसण्याचं काम बायांचं असतं, त्यांनीच सर्वांचं भलं पाहायचं असतं.”
“हा वसा आहे निराळा, जमणार असेल तर हो म्हणा, नाहीतर इथून चालू पडा.”
“ माय आमच्यावर कोपू नकोस, आमच्या बायांच्या सुखासाठी आम्ही हा वसा पार पाडू. ”
सावित्रीमाय म्हणाली, “ बघा बरं, एकदा विचार करा, आणि नक्की काय ते आताच सांगा. नाहीतर उताल माताल आणि घेतला वसा टाकून द्याल.”
सगळ्या बाप्यानी वचन दिलं, “उतणार नाही मातणार नाही,घेतला वसा टाकणार नाही.”
सावित्रीमाय सांगू लागली, “ ऐका तर मग. हे आहे, ताज्या दशमीचं व्रत.”
“आम्ही शिळासप्तमीचं व्रत ऐकलं होतं माय , हे ताज्या दशमीचं व्रत कुठून आणलंस?”
“हे व्रत फार कठीण आहे, बाईची तब्येत सुधारायची आहे, म्हणून तुम्हाला स्वत:ची वागणूक बदलायची आहे. एक सवय लावून घ्यायची - घरात सगळ्यांनी बरोबर जेवायला बसायचं आणि उरलंसुरलं शिळं अन्न सगळ्यांनी वाटून खायचं. बाई देत नसेल तरी आठवणीने मागून घ्यायचं. तुम्ही वेळीअवेळी बाहेरून खाऊन येता – कधी आवडत नाही म्हणून कमी खाता, तुमच्या अशा वागण्याने घरात अन्न उरत असतं. तिला अन्न वाया घालवायचं नसतं, म्हणून ते तिच्या पोटी जात रहातं.”
“पण यात चूक बाईची नाही का? बाईने एवढं अन्न शिजवायचंच कशाल?”
“प्रत्येक गोष्टीचं पाप बाईच्या माथी मारू नका. घराबाहेर जाणारे तुम्ही - जेवायला येणार की नाही हे तिला सांगत नाही. उशीर झाला की बाहेरच खाऊन येता, नाहीतर कधी तिला न विचारता पाहुण्यांना जेवायला घेऊन येता. मग जास्ती झालेलं शिळं तिला खावं लागतं आणि कमी पडलं तर तिलाच उपाशी राहावं लागतं. आता तुम्हीही शिकून घ्यायचा आहे स्वयंपाक, समजून घ्या सगळं मोजमाप. तिलाही तुम्ही करून घाला, ताज्या दशमीचा घास ”
सगळे पुरुष घाबरले, “हा वसा तर फारच कठीण आहे.”
“मी म्हटलं होतं ना? तुम्हांला झेपणार नाही हे ताज्या दशमीचं व्रत ?”
“ नाही नाही सावित्रीमाय, आम्ही हे व्रत नक्की करू. आणखी काय करायचं ते तू सांग.”
“इतकी वर्षे ती तुमच्या तब्येतीसाठी जे जे करत होती ते ते तुम्ही आठवा आणि सगळं तसं करा.”
“म्हणजे गरम ताजी न्याहारी, ताजे जेवण आणि चांगली तब्येत”
“ अगदी बरोबर. हेच आहे ताज्या दशमीचे व्रत, तेच करा अविरत. घरच्या बायकांना मिळू द्या ताजे सकस अन्न, त्यांचे मन राहील प्रसन्न.”
या कहाणीतल्या पुरुषांनी जसं ‘ताज्या दशमीचं व्रत’ आपल्या घरच्या बायांसाठी घेतलं आणि तसे तुम्हीही हे व्रत घ्या आणि सुखी व्हा. ही ताज्या दशमीची कहाणी, सगळ्या घरामध्ये घडो. सगळ्या बायांना उदंड आयुष्य लाभो.
“माय माय, आमच्यावर धर मायेची साय आणि सांग आम्हांला तुझी राय”
“मला कळेल असं बोला,सापडेल तुमच्या दुखण्यावर उतारा”
“आमच्या सगळ्यांच्या घरातल्या बायांना काहीनाकाही आजार आहेत ,पण तुझ्या लेकीसुना मात्र खुशाल आहेत. ही कुठली जादू आहे? ते आम्हाला सांग.”
सावित्रीमाय म्हणाली, “जादू नाही, काही नाही. आम्हीही या गावचंच पितो पाणी,पण आमच्या घरची वेगळी आहे कहाणी. आम्ही ताज्या दशमीचा वसा घेतला आहे! ”
“माय माय, आम्हाला तुझा वसा सांग, आमच्या बायकामुली फेडतील पांग”
“बाबानो हा वसा लेकी-सुनांसाठी,आपल्या माय-बहिणीसाठी, सखीसजणीसाठी पुरुषांनी घ्यायचा आहे.”
“हे तू काय विपरीत बोलतेस माय? वसा वसण्याचं काम बायांचं असतं, त्यांनीच सर्वांचं भलं पाहायचं असतं.”
“हा वसा आहे निराळा, जमणार असेल तर हो म्हणा, नाहीतर इथून चालू पडा.”
“ माय आमच्यावर कोपू नकोस, आमच्या बायांच्या सुखासाठी आम्ही हा वसा पार पाडू. ”
सावित्रीमाय म्हणाली, “ बघा बरं, एकदा विचार करा, आणि नक्की काय ते आताच सांगा. नाहीतर उताल माताल आणि घेतला वसा टाकून द्याल.”
सगळ्या बाप्यानी वचन दिलं, “उतणार नाही मातणार नाही,घेतला वसा टाकणार नाही.”
सावित्रीमाय सांगू लागली, “ ऐका तर मग. हे आहे, ताज्या दशमीचं व्रत.”
“आम्ही शिळासप्तमीचं व्रत ऐकलं होतं माय , हे ताज्या दशमीचं व्रत कुठून आणलंस?”
“हे व्रत फार कठीण आहे, बाईची तब्येत सुधारायची आहे, म्हणून तुम्हाला स्वत:ची वागणूक बदलायची आहे. एक सवय लावून घ्यायची - घरात सगळ्यांनी बरोबर जेवायला बसायचं आणि उरलंसुरलं शिळं अन्न सगळ्यांनी वाटून खायचं. बाई देत नसेल तरी आठवणीने मागून घ्यायचं. तुम्ही वेळीअवेळी बाहेरून खाऊन येता – कधी आवडत नाही म्हणून कमी खाता, तुमच्या अशा वागण्याने घरात अन्न उरत असतं. तिला अन्न वाया घालवायचं नसतं, म्हणून ते तिच्या पोटी जात रहातं.”
“पण यात चूक बाईची नाही का? बाईने एवढं अन्न शिजवायचंच कशाल?”
“प्रत्येक गोष्टीचं पाप बाईच्या माथी मारू नका. घराबाहेर जाणारे तुम्ही - जेवायला येणार की नाही हे तिला सांगत नाही. उशीर झाला की बाहेरच खाऊन येता, नाहीतर कधी तिला न विचारता पाहुण्यांना जेवायला घेऊन येता. मग जास्ती झालेलं शिळं तिला खावं लागतं आणि कमी पडलं तर तिलाच उपाशी राहावं लागतं. आता तुम्हीही शिकून घ्यायचा आहे स्वयंपाक, समजून घ्या सगळं मोजमाप. तिलाही तुम्ही करून घाला, ताज्या दशमीचा घास ”
सगळे पुरुष घाबरले, “हा वसा तर फारच कठीण आहे.”
“मी म्हटलं होतं ना? तुम्हांला झेपणार नाही हे ताज्या दशमीचं व्रत ?”
“ नाही नाही सावित्रीमाय, आम्ही हे व्रत नक्की करू. आणखी काय करायचं ते तू सांग.”
“इतकी वर्षे ती तुमच्या तब्येतीसाठी जे जे करत होती ते ते तुम्ही आठवा आणि सगळं तसं करा.”
“म्हणजे गरम ताजी न्याहारी, ताजे जेवण आणि चांगली तब्येत”
“ अगदी बरोबर. हेच आहे ताज्या दशमीचे व्रत, तेच करा अविरत. घरच्या बायकांना मिळू द्या ताजे सकस अन्न, त्यांचे मन राहील प्रसन्न.”
या कहाणीतल्या पुरुषांनी जसं ‘ताज्या दशमीचं व्रत’ आपल्या घरच्या बायांसाठी घेतलं आणि तसे तुम्हीही हे व्रत घ्या आणि सुखी व्हा. ही ताज्या दशमीची कहाणी, सगळ्या घरामध्ये घडो. सगळ्या बायांना उदंड आयुष्य लाभो.