मी चाळीतल्या मध्यमवर्गीय घरात लहानाची मोठी झाले. आईला स्वैपाकाची आवड होती. आई स्वैपाक करत असताना एक स्टुलावर उभी राहून मी तो बघायचे. आईला पुरणपोळी, मोदक, श्रीखंड, गुलाबजाम सगळे छान करता यायचे. मी ते बघून करायला शिकले. शेजारी गेले की त्या काकू भाजी, गहू, तांदूळ निवडत असतील तर त्यांना मदत करायचे. मी 10 वर्षांची झाले आणि आई ऑफिसात जायला लागली. ती सकाळीच एकदा पोळ्या करून ठेवायची. सकाळी आम्ही पोळीभाजी खाऊन शाळेत जायचो. शाळेतून आल्यावर खाण्यासाठी ती उपमा वगैरे करून ठेवायची किंवा धिरड्यांचे पीठ भिजवून ठेवायची. माझा भाऊसुद्धा धिरडी करून खायचा. वडील आईच्या आधी ऑफिस मधून यायचे. ते तिला घरी आल्यावर आयता चहा द्यायचे. मीही स्वैपाकात मदत करायचे. पण रोजचा स्वैपाक कधी शिकले नाही. आई पण म्हणायची की तू अभ्यास कर. तरी शेजारच्या काकूकडे रोज शेवटची पोळी लाटून भाजायला शिकले होते. मेडिकल ला गेल्यावर मात्र आवड होती तरी स्वैपाकाची सवय अगदीच सुटली.
लग्नानंतर सासर चाळीतच मिळाले. माझी लग्नाआधी 3rd MBBS ची परीक्षा झाली होती. त्यात मी फेल झाले. म्हणजे 6 महिने घरीच बसायचे होते. ज्या दिवशी आम्ही हनिमूनहुन आलो त्या दिवशी सासू ताप आल्याने झोपून होती. (नंतरच्या अनुभवामुळे ते सोंग असावे असे आता वाटते). मी नणदेच्या मदतीने वॉशिंग मशीन मध्ये कपडे धुतले. मग जशी आली तशी कणिक भिजवली आणि एक भाजी केली. कुकर लावायला मला सासर्यांनी शिकवला. पोळ्या जरा जाड झाल्या होत्या. बाकी ठीक झाले होते. दुसऱ्या दिवसापासून सासूने स्वैपाक शिकवायला सुरुवात केली. भाजीत गूळ घातला की सगळे आवडीने खातात हा मंत्र दिला. सासर्यांचे हार्ट व्हॉल्व्ह रिप्लेसमेंटचे ऑपरेशन झाले होते आणि डायबेटिस होता. ते सकाळी जेवून आणि डबा घेऊन 9 ला निघायचे. नवरा डबा घेऊन साडेनऊ ला निघायचा. सासूने सकाळचे सगळे काम माझ्यावर टाकले.
सासू नोकरी करत नसली तरी तिचे भजनी मंडळ होते. ते तिचे करियर होते. रोज दुपारी साडेतीनला स्वतःपुरता चहा करून घेऊन ती जी बाहेर जायची ती भाजी घेऊन साडेआठला घरात एन्ट्री करायची. तोपर्यंत सासऱ्यांचे जेवण आटपून ते हात धुवायला उठत असायचे. त्यांना उभे राहून वाढायला लागायचे; ते हाताने काही घ्यायचे नाहीत. सासू आली की ती स्वतःपुरते काहीतरी चविष्ट करून खायची. ते फक्त तिच्या आवडत्या लोकांना म्हणजे माझ्या नवऱ्याला मिळायचे.
मला आवड असल्याने मी वेगवेगळे पदार्थ शिकून घेतले. पण हा रोजचा स्वैपाक गळ्यात पडल्याने माझी आवड नष्ट होऊ लागली. सहा महिन्यांनी मी परीक्षा पास झाले आणि माझी इंटर्नशिप सुरू झाली आणि त्याच बरोबर प्रेग्नन्सी सुद्धा. मला सकाळी सातलाच घराबाहेर पडायला लागायचे. त्यामुळे सकाळचा स्वैपाक मी करू शकत नव्हते. संध्याकाळी मी घरी आल्यापासून मला कामाला जुंपण्यात यायचे. मी सासूला न विचारता मूल होऊ देण्याचा निर्णय घेतला होता, त्यामुळे कौतुकाऐवजी माझ्यावर जास्तीतजास्त काम लादणे सुरू झाले. कशीबशी मी इंटर्नशिप पूर्ण केली तेव्हा माझा मुलगा 4 महिन्यांचा होता. तेव्हा माझ्या नवऱ्याने सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आणि MD ला प्रवेश घ्यायला लावला. त्यानंतर स्वैपाक, मुलगा आणि सासऱ्यांचे आजारपण अशी माझी तिहेरी कसरत सुरू झाली. नवऱ्याची काहीच मदत होत नसे, त्यामुळे मी रुटीन स्वैपाकालाही वैतागवाडी म्हणू लागले. त्या काळात मी नायर हॉस्पिटलमध्ये लेक्चरर म्हणून नोकरी करत होते. तिथे एखादी पार्टी असेल तर असे वाटायचे आता आपल्यालाच सगळे आवरायचं आहे. खरं म्हणजे तिथले नोकर आवरावरी करायचे. ते पाहून बरे वाटायचे. एखादा पुरुष काम करतोय आणि आपण बसलोय ही भावनाच सुखवायची.
आमच्या घरी सासू पावकिलोच्यावर काही सामान आणायची नाही. पोहे करायचे ठरवले तरी ते आणण्यापासून तयारी करावी लागायची. घरातले पुरुष इकडची काडी तिकडे करायचे नाहीत. हे सगळे फारच दुःखदायक होते. माहेरी पूर्ण स्वातंत्र्य अनुभवल्यावर तर हे सहन होणे शक्यच नव्हते. तरीही मी 11 वर्षे त्या गुलामीत काढली. आणि शेवटी मी अनेक गोष्टींना कंटाळून एकदाचे ते घर सोडले. त्यानंतर आता मी फक्त स्वतःपुरता स्वयंपाक करते. असं वाटतं की मला कोणी सुगरण नाही म्हटले तरी चालेल. एवढी मी त्या स्वयंपाकाला वैतागले आहे.
मी एकटी राहत असले तरी जेवणात खूप आवडीनिवडी असल्याने स्वतःच स्वैपाक करते. मात्र मी तेव्हा पोळ्या करकरून खूप वैतागले असल्यामुळे बरीच वर्षे पोहे, भात ह्यावरच राहिले. जोपर्यंत वडील होते तोपर्यंत ते माझ्याकडे आले की पोळीभाजी करायचे. एरवी मी इडली, डोसे, थालीपीठ वगैरे करायचे पण जास्त करून भातच खात असे. ह्याने मी स्वतःचे खूप नुकसान करून घेतले.
लग्नानंतर सासर चाळीतच मिळाले. माझी लग्नाआधी 3rd MBBS ची परीक्षा झाली होती. त्यात मी फेल झाले. म्हणजे 6 महिने घरीच बसायचे होते. ज्या दिवशी आम्ही हनिमूनहुन आलो त्या दिवशी सासू ताप आल्याने झोपून होती. (नंतरच्या अनुभवामुळे ते सोंग असावे असे आता वाटते). मी नणदेच्या मदतीने वॉशिंग मशीन मध्ये कपडे धुतले. मग जशी आली तशी कणिक भिजवली आणि एक भाजी केली. कुकर लावायला मला सासर्यांनी शिकवला. पोळ्या जरा जाड झाल्या होत्या. बाकी ठीक झाले होते. दुसऱ्या दिवसापासून सासूने स्वैपाक शिकवायला सुरुवात केली. भाजीत गूळ घातला की सगळे आवडीने खातात हा मंत्र दिला. सासर्यांचे हार्ट व्हॉल्व्ह रिप्लेसमेंटचे ऑपरेशन झाले होते आणि डायबेटिस होता. ते सकाळी जेवून आणि डबा घेऊन 9 ला निघायचे. नवरा डबा घेऊन साडेनऊ ला निघायचा. सासूने सकाळचे सगळे काम माझ्यावर टाकले.
सासू नोकरी करत नसली तरी तिचे भजनी मंडळ होते. ते तिचे करियर होते. रोज दुपारी साडेतीनला स्वतःपुरता चहा करून घेऊन ती जी बाहेर जायची ती भाजी घेऊन साडेआठला घरात एन्ट्री करायची. तोपर्यंत सासऱ्यांचे जेवण आटपून ते हात धुवायला उठत असायचे. त्यांना उभे राहून वाढायला लागायचे; ते हाताने काही घ्यायचे नाहीत. सासू आली की ती स्वतःपुरते काहीतरी चविष्ट करून खायची. ते फक्त तिच्या आवडत्या लोकांना म्हणजे माझ्या नवऱ्याला मिळायचे.
मला आवड असल्याने मी वेगवेगळे पदार्थ शिकून घेतले. पण हा रोजचा स्वैपाक गळ्यात पडल्याने माझी आवड नष्ट होऊ लागली. सहा महिन्यांनी मी परीक्षा पास झाले आणि माझी इंटर्नशिप सुरू झाली आणि त्याच बरोबर प्रेग्नन्सी सुद्धा. मला सकाळी सातलाच घराबाहेर पडायला लागायचे. त्यामुळे सकाळचा स्वैपाक मी करू शकत नव्हते. संध्याकाळी मी घरी आल्यापासून मला कामाला जुंपण्यात यायचे. मी सासूला न विचारता मूल होऊ देण्याचा निर्णय घेतला होता, त्यामुळे कौतुकाऐवजी माझ्यावर जास्तीतजास्त काम लादणे सुरू झाले. कशीबशी मी इंटर्नशिप पूर्ण केली तेव्हा माझा मुलगा 4 महिन्यांचा होता. तेव्हा माझ्या नवऱ्याने सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आणि MD ला प्रवेश घ्यायला लावला. त्यानंतर स्वैपाक, मुलगा आणि सासऱ्यांचे आजारपण अशी माझी तिहेरी कसरत सुरू झाली. नवऱ्याची काहीच मदत होत नसे, त्यामुळे मी रुटीन स्वैपाकालाही वैतागवाडी म्हणू लागले. त्या काळात मी नायर हॉस्पिटलमध्ये लेक्चरर म्हणून नोकरी करत होते. तिथे एखादी पार्टी असेल तर असे वाटायचे आता आपल्यालाच सगळे आवरायचं आहे. खरं म्हणजे तिथले नोकर आवरावरी करायचे. ते पाहून बरे वाटायचे. एखादा पुरुष काम करतोय आणि आपण बसलोय ही भावनाच सुखवायची.
आमच्या घरी सासू पावकिलोच्यावर काही सामान आणायची नाही. पोहे करायचे ठरवले तरी ते आणण्यापासून तयारी करावी लागायची. घरातले पुरुष इकडची काडी तिकडे करायचे नाहीत. हे सगळे फारच दुःखदायक होते. माहेरी पूर्ण स्वातंत्र्य अनुभवल्यावर तर हे सहन होणे शक्यच नव्हते. तरीही मी 11 वर्षे त्या गुलामीत काढली. आणि शेवटी मी अनेक गोष्टींना कंटाळून एकदाचे ते घर सोडले. त्यानंतर आता मी फक्त स्वतःपुरता स्वयंपाक करते. असं वाटतं की मला कोणी सुगरण नाही म्हटले तरी चालेल. एवढी मी त्या स्वयंपाकाला वैतागले आहे.
मी एकटी राहत असले तरी जेवणात खूप आवडीनिवडी असल्याने स्वतःच स्वैपाक करते. मात्र मी तेव्हा पोळ्या करकरून खूप वैतागले असल्यामुळे बरीच वर्षे पोहे, भात ह्यावरच राहिले. जोपर्यंत वडील होते तोपर्यंत ते माझ्याकडे आले की पोळीभाजी करायचे. एरवी मी इडली, डोसे, थालीपीठ वगैरे करायचे पण जास्त करून भातच खात असे. ह्याने मी स्वतःचे खूप नुकसान करून घेतले.
दोन वर्षांपूर्वी मी बिकानेर मध्ये जॉब साठी गेले. तिथे जिम चालू केले आणि त्यांनी डाएट सांगितल्याप्रमाणे फक्त पोळी आणि भाजी किंवा आमटी एवढंच करू लागले. मुंबई बाहेर जॉब करताना एम्प्लॉयर राहायला घर आणि बेड, फ्रीज वगैरे देतात पण किचन चे काही सामान देत नाहीत. मी इंडक्शन वापरत होते, त्यामुळे विशेष भांडी नव्हती. 2019 डिसेंबर मध्ये मी हरियाणात जॉब घेतलाय. इथे त्यांनी गॅस सिलिंडर आणि शेगडी दिली आहे. त्यामुळे मी बरेच पदार्थ बनवू शकते. मी बिडाचा तवा, कढई नॉनस्टिक फ्रायपॅन वगैरेही घेतले आहे. पण आता खास वेगळे पदार्थ बनवावेसे वाटत नाहीत. दुपारी टिफिन मागवते. सकाळ संध्याकाळ पोळीभाजीच खाते. कधी तरी स्टाफसाठी एखादा खास पदार्थ करून नेते. खरंतर स्वतः खाण्यापेक्षा करून वाढायलाच आवडते. असं वाटतं की माझ्यातले वात्सल्य उपाशीच आहे! जॉब सोडल्यावर कदाचित सोशलवर्क म्हणून असे लोकांना खाऊ घालण्याचे काम करत राहीन...
डॉ. मंजिरी मणेरीकर
Tags
खाद्यसंस्कृती