लग्न होऊन सासरी आले तेव्हा मला स्वयंपाकघरातली कोणतीच कामं येत नव्हती.माझ्या माहेरी सुरुवातीला एकत्र कुटुंब होतं, त्यामुळे माझ्या आत्या, काकवा होत्या. त्यामुळे भांडी जागच्या जागी लावणे,कपड्यांच्या घड्या करणे आणि कधीमधी घर झाडणे आणि पानं घेणे अशी कामे आम्हा लहान मुलांना करावी लागत. त्यामुळे प्रत्यक्ष स्वयंपाक घरात काय आणि कसं करायचं याचा अनुभव मला शून्य होता. तसेच माहेरी चिंच गुळ वापरत होते का? घडीची पोळी करत का? कढीत हळद घालत का? याबद्दल मला खरंच काही माहिती नव्हती. मी सासरी अगदी कोरीपाटी घेवून आले होते. लग्नाच्या आधी मी बाहेरगावी राहत असल्याने मला अनेक गोष्टी माहित नव्हत्या. पण सासरी आल्यावर तुमच्याकडे कसं? आपल्याकडे असं... हे काहीच ऐकायला मिळाले नाही.
मी माझ्या चुलत सासूबाई सुषमा बर्वे यांच्याबरोबर राहत असे. आम्ही राहत होतो ते गाव अगदीच छोटं होतं/आहे. तिथं दिवसातून एक वेळा बस यायची,दळणवळणाची साधनं फारशी नव्हती. तर माझ्या सासूबाई या खूप निगुतीने स्वयंपाक करणाऱ्या आहेत. पण त्यांनी मला कधीही ऑर्डर सोडली नाही, त्या म्हणायच्या – ‘मी हे करतेय, तू काय करशील?’ मग मी एखादं काम सांगायचे. उदा.मी कुकर लावते असं म्हटलं,तर त्या म्हणत – ‘घरात कितीजण आहेत? त्यानुसार भात लावायचा.’ त्यांचं प्रमाणाचं एक भांड होतं, त्यांनुसार एका भांड्यात दोनजणांचा भात होतो. त्या पद्धतीने त्यांनी मला मोजमाप करायला शिकवले. भाजी बटाट्याची करायची तर किती बटाटे एकाला त्यानुसार मी करायचे. यामुळे एक झालं की,मी सुरुवातीपासूनच मोजूनमापून स्वयंपाक करायला शिकले. आमच्या घरात असं म्हणतात की स्वयंपाक हे विज्ञान आहे. म्हणजे कुकरची शिट्टी करायची नाही. शिट्टी होईल असं वाटलं की gas बंद करायचा. मी हे सगळं पहिल्यांदाच करत होते आणि त्या गावात बाहेर जावून काही करण्यासारखे नव्हते. त्यामुळे मला हे शिकतांना खूप मजा आली.
आमच्या या घरात पुरुष काम करतांना दिसत. म्हणजे मला आठवतंय की धान्याची सगळी काळजी घेणे, चिंच वर्षभर पुरेल अशी तयार करून ठेवणे, तांदूळ निवडून ठेवणे अशा ज्या गोष्टी असतात ती सर्व कामे माझे सासरे करत. मुख्य म्हणजे आमच्या घरात जो तो ज्याचं त्याचं जेवणाचं ताट घासून टाकत असत. पाहुणे आले तरी ते आमच्या घरातल्या लोकांचे बघून ताट घासत असत. तसेच जो तो ज्याचे त्याचे कपडे धुवून टाके. त्यामुळे मी एका खेड्यात जरी राहत होते तरी घरात फक्त स्त्रियांनीच काम करायचे असा काही नियम नव्हता. त्यामुळे माझं स्वयंपाक घरातलं शिक्षण हे मजेत झालं. भाकरी थापतांना दोन्ही हात कसे वापरायचे,त्याला पापुद्रा येण्यासाठी ती मळायची कशी आणि त्यामागे काय विज्ञान आहे हे मला माझे सासरे मस्त सांगत. अर्थात त्यामुळे मी सगळं छान करू शकले असं नाही, पण मी प्रयत्न करू लागले. त्यांच्याकडूनच मी कच्चा चिंचेचे तोखं, कवठाची जेली, जाम, च्यवनप्राश अशा गोष्टी शिकले.म्हणजे ते करत असत आणि मला उत्सुकता वाटली आणि मी काही विचारलं तर ते सांगत. पण मी ते केलं पाहिजे अशी जबरदस्ती नव्हती.
अजून एक फार महत्वाची आणि वेगळी गोष्ट या घरात होती, ती म्हणजे कोणी आलं की चहा न करण्याची. आमच्या घरात वाळलेल्या,उकडलेल्या भुईमुगाच्या शेंगा असत, कधी आंबे असत, तर कधी सुकवलेली केळी असत, काहीवेळेस माझे सासरे मसाल्याचे दाणे करून ठेवत. या गोष्टी पाहुणे किंवा कोणी गप्पा मारायला,भेटायला आलेल्यांना दिले जाई. चहा आणि त्याचे कप विसळणे हे काम करावे लागत नसे. माझं लग्न झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात या गोष्टी मला फार महत्वाच्या आणि कौतुकाच्या वाटल्या.
कधी कधी दिवाळीत किंवा लग्न कार्याच्या वेळी घरात बाहेरगावी राहणारे नातेवाईक येत. त्यावेळी माझ्या चुलत सासूबाई सगळ्यांना आपापली कामं वाटून देत. त्यात पुरुषपण असत. त्या काकुंचे अजून एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे एखादा नवीन पदार्थ केला असेल आणि तो सर्वांना पुरेल की नाही; अशी शंका असेल तर त्या तो पदार्थ सगळ्यांना म्हणजे घरतल्या स्त्रियांना सुद्धा योग्य पद्धतीने वाटत. किंवा सरळ काढून ठेवत आणि म्हणत की आता संपला. तसेच शिळा पदार्थ सुद्धा सगळ्यांना सारखा वाटत. त्यामुळे आम्हांला कोणालाच शिळं एकट्याने खाण्याची सवय नाही.एकतर त्यांच्या पद्धतीने केले तर उरायचे नाहीच.या सगळ्याचा खूप चांगला परिणाम माझ्यावर झाला.
अजून एक खूप चांगली गोष्ट माझ्या सासरी होती ती म्हणजे काम सोप्पं होईल अशा यंत्रांची आवड. त्यामुळे कपडे धुण्याचे मशीन, मिक्सर, मायक्रोवेव्ह या वस्तू घरातील स्त्रियांबरोबर पुरुष सुद्धा वापरत. त्यात हल्लीच्या स्त्रियांना कसं काम नसतं हा भाव नव्हता. त्यामुळे घरातले पुरुष काम करत आहेत याबद्दल माझ्या मनात कधीही अपराधीभाव निर्माण झाला नाही.
मी माझ्या चुलत सासूबाई सुषमा बर्वे यांच्याबरोबर राहत असे. आम्ही राहत होतो ते गाव अगदीच छोटं होतं/आहे. तिथं दिवसातून एक वेळा बस यायची,दळणवळणाची साधनं फारशी नव्हती. तर माझ्या सासूबाई या खूप निगुतीने स्वयंपाक करणाऱ्या आहेत. पण त्यांनी मला कधीही ऑर्डर सोडली नाही, त्या म्हणायच्या – ‘मी हे करतेय, तू काय करशील?’ मग मी एखादं काम सांगायचे. उदा.मी कुकर लावते असं म्हटलं,तर त्या म्हणत – ‘घरात कितीजण आहेत? त्यानुसार भात लावायचा.’ त्यांचं प्रमाणाचं एक भांड होतं, त्यांनुसार एका भांड्यात दोनजणांचा भात होतो. त्या पद्धतीने त्यांनी मला मोजमाप करायला शिकवले. भाजी बटाट्याची करायची तर किती बटाटे एकाला त्यानुसार मी करायचे. यामुळे एक झालं की,मी सुरुवातीपासूनच मोजूनमापून स्वयंपाक करायला शिकले. आमच्या घरात असं म्हणतात की स्वयंपाक हे विज्ञान आहे. म्हणजे कुकरची शिट्टी करायची नाही. शिट्टी होईल असं वाटलं की gas बंद करायचा. मी हे सगळं पहिल्यांदाच करत होते आणि त्या गावात बाहेर जावून काही करण्यासारखे नव्हते. त्यामुळे मला हे शिकतांना खूप मजा आली.
आमच्या या घरात पुरुष काम करतांना दिसत. म्हणजे मला आठवतंय की धान्याची सगळी काळजी घेणे, चिंच वर्षभर पुरेल अशी तयार करून ठेवणे, तांदूळ निवडून ठेवणे अशा ज्या गोष्टी असतात ती सर्व कामे माझे सासरे करत. मुख्य म्हणजे आमच्या घरात जो तो ज्याचं त्याचं जेवणाचं ताट घासून टाकत असत. पाहुणे आले तरी ते आमच्या घरातल्या लोकांचे बघून ताट घासत असत. तसेच जो तो ज्याचे त्याचे कपडे धुवून टाके. त्यामुळे मी एका खेड्यात जरी राहत होते तरी घरात फक्त स्त्रियांनीच काम करायचे असा काही नियम नव्हता. त्यामुळे माझं स्वयंपाक घरातलं शिक्षण हे मजेत झालं. भाकरी थापतांना दोन्ही हात कसे वापरायचे,त्याला पापुद्रा येण्यासाठी ती मळायची कशी आणि त्यामागे काय विज्ञान आहे हे मला माझे सासरे मस्त सांगत. अर्थात त्यामुळे मी सगळं छान करू शकले असं नाही, पण मी प्रयत्न करू लागले. त्यांच्याकडूनच मी कच्चा चिंचेचे तोखं, कवठाची जेली, जाम, च्यवनप्राश अशा गोष्टी शिकले.म्हणजे ते करत असत आणि मला उत्सुकता वाटली आणि मी काही विचारलं तर ते सांगत. पण मी ते केलं पाहिजे अशी जबरदस्ती नव्हती.
अजून एक फार महत्वाची आणि वेगळी गोष्ट या घरात होती, ती म्हणजे कोणी आलं की चहा न करण्याची. आमच्या घरात वाळलेल्या,उकडलेल्या भुईमुगाच्या शेंगा असत, कधी आंबे असत, तर कधी सुकवलेली केळी असत, काहीवेळेस माझे सासरे मसाल्याचे दाणे करून ठेवत. या गोष्टी पाहुणे किंवा कोणी गप्पा मारायला,भेटायला आलेल्यांना दिले जाई. चहा आणि त्याचे कप विसळणे हे काम करावे लागत नसे. माझं लग्न झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात या गोष्टी मला फार महत्वाच्या आणि कौतुकाच्या वाटल्या.
कधी कधी दिवाळीत किंवा लग्न कार्याच्या वेळी घरात बाहेरगावी राहणारे नातेवाईक येत. त्यावेळी माझ्या चुलत सासूबाई सगळ्यांना आपापली कामं वाटून देत. त्यात पुरुषपण असत. त्या काकुंचे अजून एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे एखादा नवीन पदार्थ केला असेल आणि तो सर्वांना पुरेल की नाही; अशी शंका असेल तर त्या तो पदार्थ सगळ्यांना म्हणजे घरतल्या स्त्रियांना सुद्धा योग्य पद्धतीने वाटत. किंवा सरळ काढून ठेवत आणि म्हणत की आता संपला. तसेच शिळा पदार्थ सुद्धा सगळ्यांना सारखा वाटत. त्यामुळे आम्हांला कोणालाच शिळं एकट्याने खाण्याची सवय नाही.एकतर त्यांच्या पद्धतीने केले तर उरायचे नाहीच.या सगळ्याचा खूप चांगला परिणाम माझ्यावर झाला.
अजून एक खूप चांगली गोष्ट माझ्या सासरी होती ती म्हणजे काम सोप्पं होईल अशा यंत्रांची आवड. त्यामुळे कपडे धुण्याचे मशीन, मिक्सर, मायक्रोवेव्ह या वस्तू घरातील स्त्रियांबरोबर पुरुष सुद्धा वापरत. त्यात हल्लीच्या स्त्रियांना कसं काम नसतं हा भाव नव्हता. त्यामुळे घरातले पुरुष काम करत आहेत याबद्दल माझ्या मनात कधीही अपराधीभाव निर्माण झाला नाही.
खरंतर ते काम आम्हांला मदत म्हणून नव्हते तर त्यांना स्वतःला कामाची आवड होती आणि आपल्याला सगळं येतं हा भाव पण होता. माझी या भावनेला हरकत असण्याचे काही कारण नव्हते! पण आमच्या घरातील काही स्त्रियांना पुरुषांचे असे स्वयंपाक घरात काम करणे, लुडबुड करणे आवडायचे नाही. त्यांना पुरुष सगळ्या गोष्टी आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी हे करतात असेही वाटे. पण माझं असं काही मत नव्हतं. पुरुषांना स्वयंपाक येत असल्याने आम्हांला स्त्रियांना कुठे जायचे असेल तर आता स्वयंपाकाचं काय? हा प्रश्न पडत नसे.
मला वाटतं आमच्या घरातले पुरुष स्वयंपाक घरात काम करतात याचे श्रेय हे माझ्या आजे सासूबाईना( सावित्री बर्वे ) जातं. कारण माझे आजेसासरे स्वातंत्र्यसैनिक होते, त्यामुळे ते घरात कधीच नसत. अशावेळी या मुलांना हाताशी घेवून त्या अनेक कामं करत. त्यांना पाच मुलं आणि तीन मुली होत्या. पण खूप सारी कामे त्या मुलग्यांना सांगत कारण मुली बाहेर शिकायला ठेवल्या होत्या. या मुली पायावर उभ्या राहिल्या पाहिजेत - असा त्यांचा आग्रह होता आणि तो त्यांनी पूर्ण केला. म्हणून मला वाटते की माझे सासरे काम करतात म्हणून माझा नवरा करतो आणि तो करतो म्हणून माझा मुलगा करतो. मला असे वाटते की कोणतेही काम लहान-मोठे नाही. आपल्याला स्वतंत्रपणे राहायचे असेल तर सगळ्याप्रकारची काम करताच आली पाहिजे मग आपण मुलगा असो की मुलगी!
मला वाटतं आमच्या घरातले पुरुष स्वयंपाक घरात काम करतात याचे श्रेय हे माझ्या आजे सासूबाईना( सावित्री बर्वे ) जातं. कारण माझे आजेसासरे स्वातंत्र्यसैनिक होते, त्यामुळे ते घरात कधीच नसत. अशावेळी या मुलांना हाताशी घेवून त्या अनेक कामं करत. त्यांना पाच मुलं आणि तीन मुली होत्या. पण खूप सारी कामे त्या मुलग्यांना सांगत कारण मुली बाहेर शिकायला ठेवल्या होत्या. या मुली पायावर उभ्या राहिल्या पाहिजेत - असा त्यांचा आग्रह होता आणि तो त्यांनी पूर्ण केला. म्हणून मला वाटते की माझे सासरे काम करतात म्हणून माझा नवरा करतो आणि तो करतो म्हणून माझा मुलगा करतो. मला असे वाटते की कोणतेही काम लहान-मोठे नाही. आपल्याला स्वतंत्रपणे राहायचे असेल तर सगळ्याप्रकारची काम करताच आली पाहिजे मग आपण मुलगा असो की मुलगी!
अश्विनी बर्वे