काही सन्माननीय अपवाद वगळता भारतातल्या सर्व पुरुषांना वटसावित्री हा सण फार आवडतो!
एकतर स्वत:ला काहीही तोशिस न लागता त्यांना आयतेच दीर्घ आयुष्य, वैभव, मुलेबाळे, त्याच्या आई वडिलांचा सांभाळ...हे सगळं त्यांच्या बायकोच्या केवळ एका उपासाने साध्य होत असेल तर कुणाला आवडणार नाही? माझ्या ओळखीतले माझ्या वडिलांच्या वयाचे आणि लहानपणी आजोबांच्या वयाचे पुरूषही वटसावित्री आणि हरतालिका या दिवशी भलतेच मृदू बनत. त्यांना आतून गुदगुल्या होत असाव्यात. अर्थात प्रत्येकाला बायकोप्रती उदंड प्रेम वाटत असले तरी त्यांच्या एक्सप्रेशनची पध्दत निरनिराळी होती. या दिवशी आमचे आजोबा आजीसाठी दारचे शेलके पेरू मुद्दाम काढवून घेत. आम्ही पोरे त्यावर डल्ला मारायच्या बेतात असलो तर - ‘वडाचा उपास आहे नं...’ - असं काही तरी आजीलाच कळेल अशा आवाजात काहीतरी पुटपुटत. तेवढ्यानेही आजीला आकाश ठेंगणे होई आणि ती उदार मनाने ते पेरु आम्हाला वाटून टाके. पण आजी आणि आजोबा दिवसभर आनंदात...काहीबाही गुणगुणत असत.
आमच्या लहानपणी बायका तीन दिवस वटसावित्रीचे व्रत करत म्हणजे उपास करत. तिस-या दिवशी मुंज झालेल्या वडाचीच पूजा करत. असे वड बहुधा गावाबाहेर असत. ठेवणीतल्या साड्या आणि दागिने घालून आणि उपासामुळे ‘तेजस्वी’ दिसत असलेल्या बायका एकमेकींना वाण देत. ते तीन्ही दिवस त्यांचे नवरे त्यांच्याशी विलक्षण प्रेमाने वागताना मी पाहिलेत. माझे काकाकाकू एकमेकांशी क्षुल्लक कारणाने सतत भांडत असत. पण या तीन दिवसात त्यांचे भांडणारे घर हसरे आणि ओलसर बने. काही कारणाने त्यावेळी काकू आजारी असेल किंवा तिच्यावर शाळेच्या कामाचा अधिक भार पडला म्हणून ती वटसावित्रीचा उपास करू शकणार नाही असे वाटले तरी काका कावरेबावरे होत. पण काकूने निग्रहाने, ‘काही झाले तरी ती उपास करणारच आहे’ , असे सांगितले की काकांचा जीव भांड्यात पडत असे. आमच्या नात्यागोत्यात तसे 'चांगले पुरुष' बरेच होते...ते घरातल्या मोठ्यांच्या आणि चावट पोरांच्या नकळत ते या दिवसात बायकोच्या कामात जमेल तसे हातभार लावायचा प्रयत्न करत.या दिवसात त्या सर्व पुरुषांना आपली बायको अप्सरेपेक्षा काकणभर अधिकच सुंदर आहे याचा साक्षात्कार होत असणार..शिवाय तिच्यात असलेले नसलेले गुणही दिसत असणार याबद्दल मला काहीच शंका नाही!
पण असे असले तरी वटसावित्रीचा सण आला की सगळ्या सोशल मिडियावर त्या व्रताच्या टवाळक्यांना ऊत येतो. अंधश्रध्दा निर्मूलनवाले, पुरोगामी आणि पर्यावरणवादी (वडाच्या फांद्या तोडून पूजा करण्यामुळे) अशा सर्वानाच यावर हिरीरीने आणि पोटतिडकीने मते मांडायची असतात. कारण एकतर स्त्रीवादी मताच्या लोकांना सावित्रीची एकंदर कथा आणि हे व्रत म्हणजे पुरुषप्रधानतेचे अगदी ठळक उदाहरण वाटते आणि दुसरे म्हणजे त्यामध्ये नंतर कधी तरी जोडलेले ते सात जन्मी हाच नवरा मिळू दे यासाठी हे व्रत करायचा आहे ही बकवास समजूत आणि अर्थातच त्यामुळे निर्माण होतात विनोद...
केवळ चिकाटीने, धैर्याने आणि योग्य दिशेने प्रयत्न केल्यास अशक्य ते साध्य होऊ शकते, या दृष्टिकोनातून सावित्रीच्या कथेकडे पाहिल्यास त्या व्रताची खिल्ली उडवावी असे वाटणार नाही. मग हे व्रत केवळ स्त्रियांनी का करायचे, याचे साधं उत्तर असे आहे की आपल्या संस्कृतीतील स्त्रियांचे दुय्यम स्थान पहाता स्त्रियांना स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी अधिक झगडावे लागते. उपासामुळे निश्चय / ठामपणा या गुणात वाढ होते हे तर सर्वश्रुत आहे. आता राहिले पर्यावरण.. आपण या दिवसात नवे कोंब यावेत म्हणून झाडांची छाटणी करतोच मग वडाच्या छोट्या फांद्या काढल्या म्हणून काय बिघडले? निदान शहरात रहाणा-यांना त्या झाडाची ओळख तरी होते.
खरे तर या निमित्ताने पावसात सैर व्हावी, उपयुक्त असलेल्या वनस्पतींची माहिती घ्यावी हा गावाबाहेर जाऊन वडाची पूजा करण्याचा हेतू असणार..वडाचे औषधी उपयोग तर आहेतच पण दुष्काळात वडाची कोवळी पाने, फळे खाल्ली तर तहान आणि भूक दोन्हीही भागते. वडासारख्या पारंब्या असलेल्या आणि बहुगुणी झाडाची जपणूक करण्यासाठीच्या अशा प्रकारच्या प्रथा जगाच्या कानाकोपर्यातल्या सर्व जून्या संस्कृतीत अजूनही आवर्जून पाळल्या जातात. काळाप्रमाणे त्यात काही बदल होतात इतकेच.
एकतर स्वत:ला काहीही तोशिस न लागता त्यांना आयतेच दीर्घ आयुष्य, वैभव, मुलेबाळे, त्याच्या आई वडिलांचा सांभाळ...हे सगळं त्यांच्या बायकोच्या केवळ एका उपासाने साध्य होत असेल तर कुणाला आवडणार नाही? माझ्या ओळखीतले माझ्या वडिलांच्या वयाचे आणि लहानपणी आजोबांच्या वयाचे पुरूषही वटसावित्री आणि हरतालिका या दिवशी भलतेच मृदू बनत. त्यांना आतून गुदगुल्या होत असाव्यात. अर्थात प्रत्येकाला बायकोप्रती उदंड प्रेम वाटत असले तरी त्यांच्या एक्सप्रेशनची पध्दत निरनिराळी होती. या दिवशी आमचे आजोबा आजीसाठी दारचे शेलके पेरू मुद्दाम काढवून घेत. आम्ही पोरे त्यावर डल्ला मारायच्या बेतात असलो तर - ‘वडाचा उपास आहे नं...’ - असं काही तरी आजीलाच कळेल अशा आवाजात काहीतरी पुटपुटत. तेवढ्यानेही आजीला आकाश ठेंगणे होई आणि ती उदार मनाने ते पेरु आम्हाला वाटून टाके. पण आजी आणि आजोबा दिवसभर आनंदात...काहीबाही गुणगुणत असत.
आमच्या लहानपणी बायका तीन दिवस वटसावित्रीचे व्रत करत म्हणजे उपास करत. तिस-या दिवशी मुंज झालेल्या वडाचीच पूजा करत. असे वड बहुधा गावाबाहेर असत. ठेवणीतल्या साड्या आणि दागिने घालून आणि उपासामुळे ‘तेजस्वी’ दिसत असलेल्या बायका एकमेकींना वाण देत. ते तीन्ही दिवस त्यांचे नवरे त्यांच्याशी विलक्षण प्रेमाने वागताना मी पाहिलेत. माझे काकाकाकू एकमेकांशी क्षुल्लक कारणाने सतत भांडत असत. पण या तीन दिवसात त्यांचे भांडणारे घर हसरे आणि ओलसर बने. काही कारणाने त्यावेळी काकू आजारी असेल किंवा तिच्यावर शाळेच्या कामाचा अधिक भार पडला म्हणून ती वटसावित्रीचा उपास करू शकणार नाही असे वाटले तरी काका कावरेबावरे होत. पण काकूने निग्रहाने, ‘काही झाले तरी ती उपास करणारच आहे’ , असे सांगितले की काकांचा जीव भांड्यात पडत असे. आमच्या नात्यागोत्यात तसे 'चांगले पुरुष' बरेच होते...ते घरातल्या मोठ्यांच्या आणि चावट पोरांच्या नकळत ते या दिवसात बायकोच्या कामात जमेल तसे हातभार लावायचा प्रयत्न करत.या दिवसात त्या सर्व पुरुषांना आपली बायको अप्सरेपेक्षा काकणभर अधिकच सुंदर आहे याचा साक्षात्कार होत असणार..शिवाय तिच्यात असलेले नसलेले गुणही दिसत असणार याबद्दल मला काहीच शंका नाही!
पण असे असले तरी वटसावित्रीचा सण आला की सगळ्या सोशल मिडियावर त्या व्रताच्या टवाळक्यांना ऊत येतो. अंधश्रध्दा निर्मूलनवाले, पुरोगामी आणि पर्यावरणवादी (वडाच्या फांद्या तोडून पूजा करण्यामुळे) अशा सर्वानाच यावर हिरीरीने आणि पोटतिडकीने मते मांडायची असतात. कारण एकतर स्त्रीवादी मताच्या लोकांना सावित्रीची एकंदर कथा आणि हे व्रत म्हणजे पुरुषप्रधानतेचे अगदी ठळक उदाहरण वाटते आणि दुसरे म्हणजे त्यामध्ये नंतर कधी तरी जोडलेले ते सात जन्मी हाच नवरा मिळू दे यासाठी हे व्रत करायचा आहे ही बकवास समजूत आणि अर्थातच त्यामुळे निर्माण होतात विनोद...
केवळ चिकाटीने, धैर्याने आणि योग्य दिशेने प्रयत्न केल्यास अशक्य ते साध्य होऊ शकते, या दृष्टिकोनातून सावित्रीच्या कथेकडे पाहिल्यास त्या व्रताची खिल्ली उडवावी असे वाटणार नाही. मग हे व्रत केवळ स्त्रियांनी का करायचे, याचे साधं उत्तर असे आहे की आपल्या संस्कृतीतील स्त्रियांचे दुय्यम स्थान पहाता स्त्रियांना स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी अधिक झगडावे लागते. उपासामुळे निश्चय / ठामपणा या गुणात वाढ होते हे तर सर्वश्रुत आहे. आता राहिले पर्यावरण.. आपण या दिवसात नवे कोंब यावेत म्हणून झाडांची छाटणी करतोच मग वडाच्या छोट्या फांद्या काढल्या म्हणून काय बिघडले? निदान शहरात रहाणा-यांना त्या झाडाची ओळख तरी होते.
![]() |
strangler fig |
उदाहरणार्थ पूर्व अफ्रिकेतल्या अनेक देशात या वड जातीतल्या झाडाची पूजा केली जाते. त्यावर भुतांची वस्ती असल्याची वदंता असल्याने त्या झाडाला आपोआपच सरंक्षण आहे. पण या झाडाची साल उगाळून दिली तर कितीही अवघड प्रसुती सुलभ होते. पारंब्यांचा रस रक्तशुध्दीसाठी वापरला जातो. हे झाले मुख्य उपयोग पण इतरही बरेच उपयोग आहेत. झाडाची साल काढण्याच्या अगोदर त्या गरोदर बाईचा नवरा, सासरा, दिर वगैरे मंडळी झाडाभोवती पाण्याचे रिंगण करतात. त्यावर फूले ठेवतात आणि त्यापुढे नैवेद्य ठेवून गाणी गातात. प्रसुती झाल्यावर नवजात बाळाला त्या झाडापुढे ठेवले जाते, त्याच्या दीर्घायुष्याची प्रार्थना केली जाते. मग बाळाचे आई आणि बाबा मिळून त्या झाडाची जिथून साल काढली असेल तिथे त्याच झाडाचा चीक लावून त्यावर एक लांब कापड बांधून मलमपट्टी करतात. त्यावेळी ते झाड त्या नवरा बायको आणि मुले यांना आशीर्वाद देते असे मानले जाते.
आफ्रिकेमधली strangler fig ची पूजा काय किंवा वटसावित्री ही प्रथा काय या सर्व प्रथा झाडाचे संवर्धन, मनुष्याचे निसर्गाशी नाते आणि कौटुंबिक नातेसंबंध जपणे यासाठी कृतज्ञता हे मूल्य जोपासावे यासाठीच असतात.
कुणीतरी आपल्यासाठी काहीतरी त्याग करते आहे...ही भावनाच मनाला मोठे करणारी असते. आपल्या नात्यांचे महत्व आणि ते कसे जपावे यासाठी अशा प्रथांचा मोठा उपयोग असतो. नवरा बायकोचे नाते हे खरे तर कृत्रिम असते. त्यात भावनिकतेचा ओलावा निर्माण करायला अशा प्रथा खरोखरच मदत करतात. कारण दसरा, पाडव्यासारखे यात काही देणेघेणे नसले तरी नव-याला कृतकृत्य वाटून निदान त्या जन्मापुरते तरी त्याने बायकोच्या ऋणात राहणे...हे घडते. अगदी आमच्या घराजवळच्या झोपडपट्टीमधले दारू पिऊन बायकोला मारणारे नवरे सुध्दा या दिवशी त्यांच्या बायकोने वटसावित्रीचा उपास केला असला तर..त्या दिवशी पोरांच्या अंगावर डाफरून..." मम्मीला तरास देऊ नगासा, न्हाय तर हाणतो एकेकाला"...असं बजावत असतात.
पण याचा अर्थ एखाद्या बाईची इच्छा नसताना केवळ प्रथा आहे म्हणून तिच्यावर व्रताची जबरदस्ती करणे असा मात्र अजिबात नाही. पण एखादीला मनापासून नव-याप्रती कृतज्ञता वाटत असेल तर ही एक गोड प्रथा आहे. सावित्री ही स्त्री होती म्हणून स्त्रियाच ही प्रथा पाळतात पण एखाद्या पुरुषालाही त्याच्या बायकोसाठी, तिच्या भल्यासाठी आणि कुटुंबासाठी असे व्रत करावेसे वाटले तर त्याचेही आपण स्वागतच करायला हवे. करवाचौथच्या वेळी अनेक नव-यांनीही उपास केल्याचे आपण टीव्ही वर पहातोच की...अन्यायकारक नसलेल्या प्रथा अगदी जशाच्या तशा नाही तरी काळाप्रमाणे हवे तर बदल करून पाळायला काय हरकत आहे? म्हणून नात्यातला गोडवा जपणा-या या व्रताची चेष्टा करण्यापेक्षा आपल्या संस्कृतीचा भाग म्हणून त्याचा अभिमानच वाटायला हवा.
आफ्रिकेमधली strangler fig ची पूजा काय किंवा वटसावित्री ही प्रथा काय या सर्व प्रथा झाडाचे संवर्धन, मनुष्याचे निसर्गाशी नाते आणि कौटुंबिक नातेसंबंध जपणे यासाठी कृतज्ञता हे मूल्य जोपासावे यासाठीच असतात.
कुणीतरी आपल्यासाठी काहीतरी त्याग करते आहे...ही भावनाच मनाला मोठे करणारी असते. आपल्या नात्यांचे महत्व आणि ते कसे जपावे यासाठी अशा प्रथांचा मोठा उपयोग असतो. नवरा बायकोचे नाते हे खरे तर कृत्रिम असते. त्यात भावनिकतेचा ओलावा निर्माण करायला अशा प्रथा खरोखरच मदत करतात. कारण दसरा, पाडव्यासारखे यात काही देणेघेणे नसले तरी नव-याला कृतकृत्य वाटून निदान त्या जन्मापुरते तरी त्याने बायकोच्या ऋणात राहणे...हे घडते. अगदी आमच्या घराजवळच्या झोपडपट्टीमधले दारू पिऊन बायकोला मारणारे नवरे सुध्दा या दिवशी त्यांच्या बायकोने वटसावित्रीचा उपास केला असला तर..त्या दिवशी पोरांच्या अंगावर डाफरून..." मम्मीला तरास देऊ नगासा, न्हाय तर हाणतो एकेकाला"...असं बजावत असतात.
पण याचा अर्थ एखाद्या बाईची इच्छा नसताना केवळ प्रथा आहे म्हणून तिच्यावर व्रताची जबरदस्ती करणे असा मात्र अजिबात नाही. पण एखादीला मनापासून नव-याप्रती कृतज्ञता वाटत असेल तर ही एक गोड प्रथा आहे. सावित्री ही स्त्री होती म्हणून स्त्रियाच ही प्रथा पाळतात पण एखाद्या पुरुषालाही त्याच्या बायकोसाठी, तिच्या भल्यासाठी आणि कुटुंबासाठी असे व्रत करावेसे वाटले तर त्याचेही आपण स्वागतच करायला हवे. करवाचौथच्या वेळी अनेक नव-यांनीही उपास केल्याचे आपण टीव्ही वर पहातोच की...अन्यायकारक नसलेल्या प्रथा अगदी जशाच्या तशा नाही तरी काळाप्रमाणे हवे तर बदल करून पाळायला काय हरकत आहे? म्हणून नात्यातला गोडवा जपणा-या या व्रताची चेष्टा करण्यापेक्षा आपल्या संस्कृतीचा भाग म्हणून त्याचा अभिमानच वाटायला हवा.
मंजूषा देशपांडे
Tags
संस्कृती