दिनाकाकाच्या सोबत नंदिनीनं हवेलीत पहिलं पाऊल ठेवलं तेव्हाच ठरवून टाकलं - आता हीच आपली माणसं मानायची! तिची रक्ताची माणसं तर गावातल्या ठाकूरांनी जमिनीच्या वादात मारली होती. आपल्या घरात काम करणाऱ्या गड्याला सरकारी योजनेत मिळालेली जमीन त्यांना बघवली नाही. नंदिनीला मात्र त्यांनी जिवंत ठेवलं. आधी तिचा उपभोग घ्यायचा आणि कंटाळा आला की द्यायची मुंबईच्या कामाठीपुराला पाठवून असं त्यांचं ठरलं होतं. पण त्यांना तिचा कंटाळा यायच्या आधी नंदिनीनंच तिथून पळ काढला. तो यशस्वीही ठरला.
समोर दिसेल त्या रेल्वेत ती चढली. कुठली रेल्वे माहीत नाही. कुठं जायचंय तेही माहीत नाही. पाठलाग करणारं कुणी नाही याची खात्री पटली तेव्हा आधी ती बायकांच्या डब्यात जाऊन बसली. समोर कोणताही पुरुष दिसूच नये असं तिला वाटत होतं. तिटकारा आलेला पुरुषांचा. किती स्टेशन्स गेले. एका स्टेशनवर मधू मावशी चढल्या. स्वतःजवळची भाकरी त्यांनी नंदिनीसोबत वाटून खाल्ली. पोर एकटी आहे म्हटल्यावर तिला आपल्या घरी घेऊन आल्या. मधू मावशींचा दीर दिनकर म्हणजेच दिनाकाकाच्या ओळखीनं राणासिंगच्या हवेलीत कामाला चिकटवलं. आता परत गावाचं नाव काढायचं नाही, पडेल ते काम करायचं, मिळेल ते खायचं आणि गप पडून रहायचं, असं नंदिनीनं ठरवलं. सूडाची भावना मनात उसळत होतीच. पण ती एकटी काय करणार होती! तिच्या मागं ना पोलिस, ना पाठबळ, ना यंत्रणा. पैशाच्या जोरावर ठाकूरांनी सगळं आपल्याकडे ठेवलेलं होतं. त्यामुळेच आपल्या रक्ताच्या माणसांचा खून झाला तेव्हाच आपलं प्रोफेसर व्हायचं, मनासारख्या जोडीदारा सोबत आयुष्य घालवायचं आणि आता तर सूड घ्यायचंही स्वप्न मेलं हे नंदिनीनं ठरवून टाकलं. हतबल वाटायचं. पण इलाज नव्हता.
नंदिनीला सोडून दिनाकाका निघून गेले. नंदिनीचा दिनक्रम सुरू झाला. पहाटे उठायचं. घरातली सगळी कामं करायची, झाडलोट, पाणी भरणं, चहा करणं, कपडे धुणं. जे दिसेल ते, जे पडेल ते. सगळ्यांची जेवणं झाल्यानंतर जेवण मिळायचं. माँसाहेब रोज रात्री तिच्याकडून पायाला तेल लावून घ्यायच्या. तिची विचारपूसही करायच्या. कुठून आली, गाव का सोडलं सगळं विचारायच्या. नंदिनीनं कधी खरं सांगितलं नाही.
कधीतरी तिला न्यूजपेपर पडलेला दिसायचा. राणासिंगाच्या खोलीत काही पुस्तकंही दिसायची. वाचायचा फार मोह व्हायचा. पण आवरावा लागायचा. नंदिनीच्या भूतकाळाबद्दल कळालं असतं तर तिलाच चारित्र्यहीन समजून घरातून हकलून दिलं असतं. तिच्याकडे राणासिंगची हवेली एवढा एकच आधार होता.
माँसाहेब, त्यांची तीन मुलं आणि त्यांच्या तीन बायका हे कुटुंबच तिच्या सोबत होतं. शेरसिंग आणि त्याची बायको शकुंतलादेवी, पवनसिंग आणि त्याची बायको विजयादेवी आणि सगळ्यात लहानगा मुलगा राणासिंग आणि त्याची बायको सरस्वतीदेवी यांच्यातच तिचा वेळ जायचा. राणासिंग शहरात एमबीए शिकून आलेला. माँसाहेबांच्या आग्रहाखातर त्यानं गावात थांबून घरचा व्यवसाय सांभाळायचं ठरवलं. त्यांच्याच आग्रहाखातर त्यानं सरस्वतीदेवीशी लग्नही केलं. पण त्यांचं सूत कधी जुळलंच नाही. घरात माँसाहेबांच्या विरोधात बोलायची कुणाचीही बिशाद नव्हती. माँसाहेब म्हणतील तोच शब्द अखेरचा.
एक दिवस संध्याकाळच्या वेळी भांडणाचे आवाज नंदिनीला आले. तिनं हॉलमधे डोकावून पाहिलं तर सगळा परिवार जमला होता. घटस्फोटाची नोटीस दारात येईल असं सांगून सरस्वतीदेवी दिवेलागणीच्या वेळीच घरातून निघून गेल्या. जाताना माँसाहेब सरस्वतीदेवीला म्हणाल्या, ‘जा ग वांझोटे. पुढच्या एका वर्षात या घरात पाळणा हालेल. शब्दय् माझा!’
हे एवढंच नंदिनीला कळालं. राणासिंग तिथंच मान खाली घालून उभे होते. पुढचे काही दिवस घरात वकील येत होते. कोर्ट कचेऱ्यांच्या तारख्यांना राणासिंग आणि माँसाहेब जात होते. बहुतेक त्यांचा घटस्फोट झाला असावा. त्यानंतर काहीच दिवसातच घरात कसलीतरी पुजा आहे, सगळी तयारी करून ठेव असं माँसाहेबांनी नंदिनीला सांगितलं. तिलाही नवी भारीतली साडी भेट दिली. पुजेला हीच नेसायची अशी ताकीद दिली. नेमकं काय होतंय हे कळायच्या आतच नंदिनी आणि राणाचं लग्न लावून दिलं गेलं. लग्नानंतर माँसाहेब तिला आपल्या खोलीत घेऊन गेल्या. एका महिन्यात गोड बातमी दिली नाही तर ठाकूरांच्या हवेलीवर पाठवून देईन, असं माँसाहेबांनी बजावलं. बाहेर एका दिवशी १० जणांसोबत झोपण्यापेक्षा इथं एकाशीच संबंध ठेवणं बरं; अशी ऑफर नंदिनीसमोर ठेवली. माँसाहेबांना हे सगळं कळालं कसं, त्यांना कुणी सांगितलं नंदिनीला काही कळेना. पण त्याक्षणी ते मान्य करण्याशिवाय दुसरा इलाज नव्हता. तिला त्यांचं ऐकावंच लागलं.
राणासिंगच्या खोलीबाहेर सोडायला माँसाहेब आल्या होत्या. त्यांनी डोळे मोठे करून तिला आत जायला सांगितलं. नंदिनीनं दार वाजवलं आणि आत गेली. राणासिंग म्हणाले, नंदिनी दाराला कडी घालून इकडं ये. थरथरत्या हातांनी तिनं कडी बंद केली. राणासिंग खुर्चीत बसले होते तिथं आली. ते उठले. नंदिनी दोन पावलं मागे सरकली. आणि राणासिंग म्हणाले, ’नंदिनी, आपलं एकमेकांवर प्रेम नाही. तर आपल्यात कुठलेही संबंध असू शकणार नाहीत. तुझ्या मर्जीविरोधात तर मला काहीही करायचं नाही. हे सगळं मला माँसाहेबांच्या प्रेशरमुळे करावं लागतंय. त्यांच्या प्रेशरमुळेच तुला रोज रात्री इथं यावं लागेल. पण मी तुला काहीही करणार नाही हे नक्की!’ नंदिनीला काही कळेनाच. हे काय असं? माझं काही चुकलं की काय? की हाही कुठल्यातरी प्लॅनचाच एक भाग आहे ?
पण हळूहळू नंदिनीला राणासिंगांचं वेगळेपण उमगलं. पवनसिंगच्या बायकोच्या पोटातली मुलगी पाडण्याला त्यांनी केलेला विरोध, मोठ्या भावानं, शेरसिंगनं, बायकोला मारलं तेव्हाही ते वहिनींसोबत उभं राहिले होते, अन्न उरलं नाही तर परत बनवायचं पण घरातला प्रत्येक नोकर जेवण करूनच झोपणार अशी ताकीद देणं, नोकरांच्या पोरांना आणि पोरींनाही शहरात शिकायला मदत करणं नंदिनीला अनेक गोष्टी कळत गेल्या. यातल्या बऱ्याच गोष्टी माँसाहेबांना माहीत नाहीत हेही तिला उमगलं. माँसाहेबांचा थेट विरोध राणासिंगांना घ्यायचा नव्हता. म्हणूनच सरस्वती देवींशी त्यांनी लग्नाला होकार दिला. सरस्वतीदेवींचं दुसऱ्या मुलावर प्रेम आहे हे लग्नानंतर कळालं. तेव्हा त्या मुलाला शोधून त्यांचं सरस्वतीदेवींशी जमवणारे राणासिंगच होते. घरात कुणाला कळू नये म्हणून दोघांनी ठरवून राणासिंग यांनाच मूल होऊ शकत नाही त्यामुळे संसार करायचा नाही, असं सांगितलं. पण आपल्या मुलात दोष आहे ही गोष्ट माँसाहेबांच्या पचनी पडेना. सरस्वतीच वांझोटी आहे असं त्यांनी ठरवूनच टाकलं. स्वतःचं खरं करण्यासाठी आव्हान स्वीकारलं आणि नंदिनीला पुढे केलं.
असे कसे हे राणासिंग, नंदिनीला कळायचंच नाही. पुरुष असताना इतक्या हळव्या मनाचे? इतके काळजी करणारे? तू माझी दासी नाहीस, माझ्या पायाशी बसायची गरज नाही. तुझे तू निर्णय घेत जा असं त्यांचं सांगणं नंदिनीला कळायचंच नाही. तिनं तिच्या वडलांनाही नेहमी आईवर ओरडताना, तिला मारताना पाहिलं होतं. एकदा आईनं जमिनीबाबतचा सल्ला दिला म्हणून बाबांनी जेवणाचं ताट फेकून दिलं होतं. पण राणासिंग नंदिनीला आवर्जून विचारत होते. तिला गोष्टी समजावून सांगत होते. असा पुरुष नंदिनीनं कधीच पाहिला नव्हता.
महिना संपत आला तशा माँसाहेब अस्वस्थ होऊ लागल्या. अजून काहीच कसं झालं नाही? सरस्वती म्हणते ते खरं आहे की काय असं त्यांना वाटू लागलं. एक दिवस नंदिनीला बोलावून तिला उलटे सुलटे प्रश्न विचारले. नंदिनीला फार वेळ खोटं बोलता आलं नाही.
राणासिंग आणि तिच्यात काहीच संबंध आले नाहीत हे समजल्यानंतर माँसाहेब भयंकर संतापल्या, ‘एक काम दिलं होतं, तेही केलं नाहीस’ - असं म्हणत तिच्या केसाला धरून ओढत खोलीबाहेर आणलं. शेरसिंगला ठाकूरांना फोन करायचा आदेशच दिला. इतरवेळी आधारासाठी वापरली जाणारी काठी त्यांनी जमिनीवर पडलेल्या नंदिनीवर उचलली. आणि तिला फटका बसणार इतक्यात मागून राणासिंगानी ती खेचून घेतली. आयुष्यात पहिल्यांदा माँसाहेबांच्या विरोधात ते उभे राहिले होते. ‘नंदिनी कोणत्याही ठाकूरकडे जाणार नाही आणि तिला कुणी मारणारही नाही,’ त्यांनी ठणकावूनच सांगितलं. काठी खाली फेकून दिली. घरातल्या पुरुषसत्तेनं सारवलेल्या भिंतींमधे काठीचा आवाज घुमत राहिला.
समोर दिसेल त्या रेल्वेत ती चढली. कुठली रेल्वे माहीत नाही. कुठं जायचंय तेही माहीत नाही. पाठलाग करणारं कुणी नाही याची खात्री पटली तेव्हा आधी ती बायकांच्या डब्यात जाऊन बसली. समोर कोणताही पुरुष दिसूच नये असं तिला वाटत होतं. तिटकारा आलेला पुरुषांचा. किती स्टेशन्स गेले. एका स्टेशनवर मधू मावशी चढल्या. स्वतःजवळची भाकरी त्यांनी नंदिनीसोबत वाटून खाल्ली. पोर एकटी आहे म्हटल्यावर तिला आपल्या घरी घेऊन आल्या. मधू मावशींचा दीर दिनकर म्हणजेच दिनाकाकाच्या ओळखीनं राणासिंगच्या हवेलीत कामाला चिकटवलं. आता परत गावाचं नाव काढायचं नाही, पडेल ते काम करायचं, मिळेल ते खायचं आणि गप पडून रहायचं, असं नंदिनीनं ठरवलं. सूडाची भावना मनात उसळत होतीच. पण ती एकटी काय करणार होती! तिच्या मागं ना पोलिस, ना पाठबळ, ना यंत्रणा. पैशाच्या जोरावर ठाकूरांनी सगळं आपल्याकडे ठेवलेलं होतं. त्यामुळेच आपल्या रक्ताच्या माणसांचा खून झाला तेव्हाच आपलं प्रोफेसर व्हायचं, मनासारख्या जोडीदारा सोबत आयुष्य घालवायचं आणि आता तर सूड घ्यायचंही स्वप्न मेलं हे नंदिनीनं ठरवून टाकलं. हतबल वाटायचं. पण इलाज नव्हता.
नंदिनीला सोडून दिनाकाका निघून गेले. नंदिनीचा दिनक्रम सुरू झाला. पहाटे उठायचं. घरातली सगळी कामं करायची, झाडलोट, पाणी भरणं, चहा करणं, कपडे धुणं. जे दिसेल ते, जे पडेल ते. सगळ्यांची जेवणं झाल्यानंतर जेवण मिळायचं. माँसाहेब रोज रात्री तिच्याकडून पायाला तेल लावून घ्यायच्या. तिची विचारपूसही करायच्या. कुठून आली, गाव का सोडलं सगळं विचारायच्या. नंदिनीनं कधी खरं सांगितलं नाही.
कधीतरी तिला न्यूजपेपर पडलेला दिसायचा. राणासिंगाच्या खोलीत काही पुस्तकंही दिसायची. वाचायचा फार मोह व्हायचा. पण आवरावा लागायचा. नंदिनीच्या भूतकाळाबद्दल कळालं असतं तर तिलाच चारित्र्यहीन समजून घरातून हकलून दिलं असतं. तिच्याकडे राणासिंगची हवेली एवढा एकच आधार होता.
माँसाहेब, त्यांची तीन मुलं आणि त्यांच्या तीन बायका हे कुटुंबच तिच्या सोबत होतं. शेरसिंग आणि त्याची बायको शकुंतलादेवी, पवनसिंग आणि त्याची बायको विजयादेवी आणि सगळ्यात लहानगा मुलगा राणासिंग आणि त्याची बायको सरस्वतीदेवी यांच्यातच तिचा वेळ जायचा. राणासिंग शहरात एमबीए शिकून आलेला. माँसाहेबांच्या आग्रहाखातर त्यानं गावात थांबून घरचा व्यवसाय सांभाळायचं ठरवलं. त्यांच्याच आग्रहाखातर त्यानं सरस्वतीदेवीशी लग्नही केलं. पण त्यांचं सूत कधी जुळलंच नाही. घरात माँसाहेबांच्या विरोधात बोलायची कुणाचीही बिशाद नव्हती. माँसाहेब म्हणतील तोच शब्द अखेरचा.
एक दिवस संध्याकाळच्या वेळी भांडणाचे आवाज नंदिनीला आले. तिनं हॉलमधे डोकावून पाहिलं तर सगळा परिवार जमला होता. घटस्फोटाची नोटीस दारात येईल असं सांगून सरस्वतीदेवी दिवेलागणीच्या वेळीच घरातून निघून गेल्या. जाताना माँसाहेब सरस्वतीदेवीला म्हणाल्या, ‘जा ग वांझोटे. पुढच्या एका वर्षात या घरात पाळणा हालेल. शब्दय् माझा!’
हे एवढंच नंदिनीला कळालं. राणासिंग तिथंच मान खाली घालून उभे होते. पुढचे काही दिवस घरात वकील येत होते. कोर्ट कचेऱ्यांच्या तारख्यांना राणासिंग आणि माँसाहेब जात होते. बहुतेक त्यांचा घटस्फोट झाला असावा. त्यानंतर काहीच दिवसातच घरात कसलीतरी पुजा आहे, सगळी तयारी करून ठेव असं माँसाहेबांनी नंदिनीला सांगितलं. तिलाही नवी भारीतली साडी भेट दिली. पुजेला हीच नेसायची अशी ताकीद दिली. नेमकं काय होतंय हे कळायच्या आतच नंदिनी आणि राणाचं लग्न लावून दिलं गेलं. लग्नानंतर माँसाहेब तिला आपल्या खोलीत घेऊन गेल्या. एका महिन्यात गोड बातमी दिली नाही तर ठाकूरांच्या हवेलीवर पाठवून देईन, असं माँसाहेबांनी बजावलं. बाहेर एका दिवशी १० जणांसोबत झोपण्यापेक्षा इथं एकाशीच संबंध ठेवणं बरं; अशी ऑफर नंदिनीसमोर ठेवली. माँसाहेबांना हे सगळं कळालं कसं, त्यांना कुणी सांगितलं नंदिनीला काही कळेना. पण त्याक्षणी ते मान्य करण्याशिवाय दुसरा इलाज नव्हता. तिला त्यांचं ऐकावंच लागलं.
राणासिंगच्या खोलीबाहेर सोडायला माँसाहेब आल्या होत्या. त्यांनी डोळे मोठे करून तिला आत जायला सांगितलं. नंदिनीनं दार वाजवलं आणि आत गेली. राणासिंग म्हणाले, नंदिनी दाराला कडी घालून इकडं ये. थरथरत्या हातांनी तिनं कडी बंद केली. राणासिंग खुर्चीत बसले होते तिथं आली. ते उठले. नंदिनी दोन पावलं मागे सरकली. आणि राणासिंग म्हणाले, ’नंदिनी, आपलं एकमेकांवर प्रेम नाही. तर आपल्यात कुठलेही संबंध असू शकणार नाहीत. तुझ्या मर्जीविरोधात तर मला काहीही करायचं नाही. हे सगळं मला माँसाहेबांच्या प्रेशरमुळे करावं लागतंय. त्यांच्या प्रेशरमुळेच तुला रोज रात्री इथं यावं लागेल. पण मी तुला काहीही करणार नाही हे नक्की!’ नंदिनीला काही कळेनाच. हे काय असं? माझं काही चुकलं की काय? की हाही कुठल्यातरी प्लॅनचाच एक भाग आहे ?
पण हळूहळू नंदिनीला राणासिंगांचं वेगळेपण उमगलं. पवनसिंगच्या बायकोच्या पोटातली मुलगी पाडण्याला त्यांनी केलेला विरोध, मोठ्या भावानं, शेरसिंगनं, बायकोला मारलं तेव्हाही ते वहिनींसोबत उभं राहिले होते, अन्न उरलं नाही तर परत बनवायचं पण घरातला प्रत्येक नोकर जेवण करूनच झोपणार अशी ताकीद देणं, नोकरांच्या पोरांना आणि पोरींनाही शहरात शिकायला मदत करणं नंदिनीला अनेक गोष्टी कळत गेल्या. यातल्या बऱ्याच गोष्टी माँसाहेबांना माहीत नाहीत हेही तिला उमगलं. माँसाहेबांचा थेट विरोध राणासिंगांना घ्यायचा नव्हता. म्हणूनच सरस्वती देवींशी त्यांनी लग्नाला होकार दिला. सरस्वतीदेवींचं दुसऱ्या मुलावर प्रेम आहे हे लग्नानंतर कळालं. तेव्हा त्या मुलाला शोधून त्यांचं सरस्वतीदेवींशी जमवणारे राणासिंगच होते. घरात कुणाला कळू नये म्हणून दोघांनी ठरवून राणासिंग यांनाच मूल होऊ शकत नाही त्यामुळे संसार करायचा नाही, असं सांगितलं. पण आपल्या मुलात दोष आहे ही गोष्ट माँसाहेबांच्या पचनी पडेना. सरस्वतीच वांझोटी आहे असं त्यांनी ठरवूनच टाकलं. स्वतःचं खरं करण्यासाठी आव्हान स्वीकारलं आणि नंदिनीला पुढे केलं.
असे कसे हे राणासिंग, नंदिनीला कळायचंच नाही. पुरुष असताना इतक्या हळव्या मनाचे? इतके काळजी करणारे? तू माझी दासी नाहीस, माझ्या पायाशी बसायची गरज नाही. तुझे तू निर्णय घेत जा असं त्यांचं सांगणं नंदिनीला कळायचंच नाही. तिनं तिच्या वडलांनाही नेहमी आईवर ओरडताना, तिला मारताना पाहिलं होतं. एकदा आईनं जमिनीबाबतचा सल्ला दिला म्हणून बाबांनी जेवणाचं ताट फेकून दिलं होतं. पण राणासिंग नंदिनीला आवर्जून विचारत होते. तिला गोष्टी समजावून सांगत होते. असा पुरुष नंदिनीनं कधीच पाहिला नव्हता.
महिना संपत आला तशा माँसाहेब अस्वस्थ होऊ लागल्या. अजून काहीच कसं झालं नाही? सरस्वती म्हणते ते खरं आहे की काय असं त्यांना वाटू लागलं. एक दिवस नंदिनीला बोलावून तिला उलटे सुलटे प्रश्न विचारले. नंदिनीला फार वेळ खोटं बोलता आलं नाही.
राणासिंग आणि तिच्यात काहीच संबंध आले नाहीत हे समजल्यानंतर माँसाहेब भयंकर संतापल्या, ‘एक काम दिलं होतं, तेही केलं नाहीस’ - असं म्हणत तिच्या केसाला धरून ओढत खोलीबाहेर आणलं. शेरसिंगला ठाकूरांना फोन करायचा आदेशच दिला. इतरवेळी आधारासाठी वापरली जाणारी काठी त्यांनी जमिनीवर पडलेल्या नंदिनीवर उचलली. आणि तिला फटका बसणार इतक्यात मागून राणासिंगानी ती खेचून घेतली. आयुष्यात पहिल्यांदा माँसाहेबांच्या विरोधात ते उभे राहिले होते. ‘नंदिनी कोणत्याही ठाकूरकडे जाणार नाही आणि तिला कुणी मारणारही नाही,’ त्यांनी ठणकावूनच सांगितलं. काठी खाली फेकून दिली. घरातल्या पुरुषसत्तेनं सारवलेल्या भिंतींमधे काठीचा आवाज घुमत राहिला.