संकटातून समृद्धीकडे


प्रशस्त कम्पाऊंडमध्ये असणारी अवाढव्य इमारत त्यावरचा मान वर करूनच संपूर्ण पाहता येणारा उंच मनोरा आणि मोठा आवाज करणारा भोंगा त्यासरशी आपली पाळी संपवून बाहेर पडणारा कष्टकरी कामगार.. ही मुंबईतल्या गिरणगावाची कोणे एकेकाळची ही ओळखआता त्यांची जागा घेतलीये ती मान उंच करूनच पाहता येणाऱ्या चकाचक इमारतींनी आणि कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांनी… पण एक गोष्ट थोड्या-फार फरकाने सारखीच राहिलीपूर्वी कष्टकऱ्यांसाठी जेवणाचे डबे देणाऱ्या बायका आता याच कंपन्यांसमोर उभं राहून कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांना  एकवेळ जेवण देणाऱ्याइथल्या कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या ‘मावशीझाल्या आहेत.




गिरणगाव.... गिरण्यांचा दिमाख आणि कामगारांच्या उत्साहाने व्यापलेले टुमदार शहरकामगारांच्या गावाकडे राहणाऱ्या कुटुंबीयांसाठी कुतूहल आणि मुंबईबाहेरील लोकांसाठी आकर्षणहे शहर घडत गेलंघडवत गेलंगिरणी कामगारांबरोबरच त्यांच्या बाजूने वाढणाऱ्या अनेक व्यवसायांनाखेळांनासंस्कृती आणि परंपरांनाहीगिरणगावाचा स्वत:च्या जगण्याचा एक बाज होतागिरण्यांच्या भोंग्यानुसार चालू राहणारे त्यांचे आयुष्य सोपे नव्हतेच कधीपण तक्रारीचा सूर नव्हता.गावाकडच्यांना चार पैसे मिळत आहेतहेच समाधान अधिक होतंहे कामगार एका खोलीत गटागटाने राहत असतबैठकीच्या खोल्यांमध्ये.एका खोलीत २०-२५ जणंही असतप्रत्येक जण आपल्या पाळीनुसार या खोलीत वावरत असेप्रश्न होता तो जेवणाचातो या गिरणगावात राहणाऱ्या काही महिलांनी सोडवलाया महिलांनी खाणावळी सुरू केल्या आणि त्या या कामगारांना त्यांच्या पाळीनुसार डबे पुरवू लागल्या.  यातून महिलांचं अर्थाजन हा भाग होताचत्याहून जास्त आत्मीयता,आपुलकी आणि आपल्या गावाकडच्या नातेवाईकाला प्रेमाने खाऊ घालण्याची इच्छा होतीसण-उत्सवानुसार गोडधोड डब्यातून मिळत असेआजारी पडल्यावर पथ्याचं जेवणहीपैशांची अडचण असेल तर उसनवारीही चालायचीत्यामुळे कामागारही पगार झाला कीखाणावळ चालवणाऱ्या वहिनींना आठवणीने गोडाची पुडी द्यायला विसरत नसत.
गिरणीचा भोंगा बंद झालातसे गिरण्यांच्या भोवताली असणारे व्यवसायही कोलमडलेपण खाणावळी जगानुसार बदलल्यामहिलांनी गिरण्यांच्या जागेवर उभ्या राहिलेला कॉर्पोरेट कंपन्या हेरल्याइथला अधिकारी हॉटेलमध्ये खाणारा असलातरी कर्मचारी मात्र घरच्या भाजी-पोळीला प्राधान्य देणारा हे त्यांना उमगलं आणि त्याच व्यवसायाला त्यांना नवी फोडणी घातलीजेवणाचा धंदा कधी मरत नाहीअसं म्हणतात.कारण दोन वेळची पोटाची भूक भागवणं जेवढं गरजेचं तेवढंच जिभेचे चोचले पुरवणंही दैनंदिनीचा भाग झालायस्वयंपाक आलाच पाहिजेहा घरातल्यांनी शिकविलेला अलिखित नियम पाळून गिरणी कामगारांच्या घरातील महिलांनी ते करण्याचं कौशल्य कमवलं होतंचगिरण्या बंद पडल्यावर त्यातील अनेकींनी ते पैसे कमवण्याचं साधन म्हणून वापरायचं ठरवलंआता त्यांनी कंपन्यांच्या प्रवेशद्वारावर स्टॉल उभे केलेहॅलो सर,मॅडमकाय खाणारतुम्हाला मागे आवडलेला पदार्थ आजही आहेअसं प्रोफेशनल बोलण्याचं कसब अवगत केलंअगदी ग्राहकाने पैसे दिल्यावरही स्मितहास्य करून थँक्यू बोलायलाही त्या विसरत नाहीत. 
गिरण्यांच्या प्रशस्त जागेत उभ्या राहिलेल्या वेगवेगळ्या गिरण्यांच्या कम्पाऊंडसमोरच छोटंसं टेबलचार-पाच मोठे स्टीलचे डबे आणि ताटं मांडून त्या उभ्या राहतातसमोर किमान दहा-बारा जणांचा घोळका...तिथे हळूच डोकावलं की, “मावशीआज कुठली भाजी?”… “वहिनी,आज दोनच चपात्या द्या,”… “ताईआज सुरमई नाही का आणली?”... असे संवाद कानावर पडतातयेथे येणारा माणूसही नेहमीचाच असल्याने या दोघांमध्ये अनोखं नातं निर्माण झालेलंत्यामुळे रोज जेवणाऱ्याला काय आवडतं आणि काय नाहीहेही त्यांना माहीत असतंरोज सकाळी कामासाठी लवकर बाहेर पडणाऱ्या या कॉर्पोरेट कल्चरमधल्या कर्मचाऱ्याला किमान ५० रुपयांत घरगुती चवीचं हमखास खात्री देणारं जेवण मिळतंमग अजून काय हवंइथल्या कॉर्पोरेट कल्चरमध्ये काम करणाऱ्या बायकाही न लाजता या स्टॉलसमोरम्हणजे अगदी रस्त्यात उभं राहून आरामात जेवताना दिसतात 
हॉटेलमधल्या थाळीत दोन भाज्यापोळीवरण-भात असतो. पण या स्टॉलवर चार प्रकारच्या भाज्या,चिकनमटणखिमाअंडामसालामोदकभाकऱ्याघावण... पदार्थांची यादी महिला भराभर सांगतात तेव्हा थक्क व्हायला होतंकाहींनी जेवणानंतर पाचक द्रव्य म्हणून ताकसोलकढीचा व्यवसायही येथे सुरू केला आहेवयाच्या पन्नाशी ओलांडलेल्या या महिला नित्यनेमाने दही लावून ताक करणंखोबरं किसून सोलकढी करणं हे काम करत असतातविशेष म्हणजे पहिल्या तासाभरातच या महिलांकडेच अनेक पदार्थ संपलेले असतातमांसाहाराला अधिक मागणी असतेपारंपरिक चवीचा मांसाहार कॉर्पोरेट कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना आकर्षित करत असल्याचे दिसते.  

 खरे तर दोन ते तीन तासांचा हा व्यवसायपण पहाटेपासून त्याची तयारी करावी लागतेत्या व्यतिरिक्त या महिला सणसमारंभासाठी ऑर्डरही घेतातया ऑर्डर आणि रोजचा व्यवसाय यात सूसुत्रता ठेवण्याचं तंत्रही त्यांनी अनुभवानं अवगत केलं आहेया महिलांमधला समान धागा म्हणजे आधी असणारी बिकट आर्थिक परिस्थितीगिरण्या बंद पडल्यावर यातील अनेकींनी हा व्यवसाय सुरू केलासंसाराची जबाबदारी त्यांनी खांद्यावर घेतली आणि ती पार पाडण्यासाठी त्या सज्ज झाल्यापण आजही मागे वळून पाहताना त्या भावूक होतातअपार मेहनतीने या दिवसांवर मात केली आणि आता समाधानाचे जीवन जगत आहोत... त्या सांगतातया व्यवसायावर त्यांनी मुलांची शिक्षणंलग्न केलीअनुभव आणि हातच्या चवीने खूप काही दिल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसतो. 

लोअर परळ भागातच नेत्रा वेंगुर्लेकर आणि शामला मुरबाडकर आठ वर्षांपासून पोळी-भाजीचा व्यवसाय करत आहेतया व्यवसायात नेत्रा यांनी शिरकाव केलातो त्यांच्या शेजारच्या वहिनीमुळेनेत्रा स्वत:सुरुवातीला नोकरी करायच्यामात्र मूल झाल्यानंतर ती त्यांना सोडावी लागलीतेव्हा त्यांचा नवरा बेस्टमध्ये कामाला होतात्यांच्या शेजारी राहणाऱ्या शामला यांची परिस्थिती बिकट होतीत्यांच्या नवऱ्याचं आजारपणामुळे निधन झालं होतंपदरात दोन लहान मुलंएक पहिलीला तर दुसरा तिसरीलासासरे मिलकामगारतर सासू गृहिणी.शामला यांनी कमाईसाठी मॉलची नोकरी पत्करलीपगार मिळायचा अवघा पाच हजार रुपयेमग त्यांनी वेगळं काहीतरी करायचं ठरवलं. “मला स्वयंपाकाची आवड होतीमाझ्या नणंदेचा पोळी-भाजीचा स्टॉल होतात्यात माझ्या भावाचं गावी रिसॉर्ट होतंत्यामुळे जास्त माणसांच्या स्वयंपाकाचा अंदाज होताचपाच वर्षांनंतर घराबाहेर पडून आम्ही याच व्यवसायापासून सुरुवात केली,’’ असं नेत्रा सांगतात. ‘‘काहीतरी करायचं,हे मी आधीपासूनच ठरवलं होतंत्यामुळे भाऊबिजेचे पैसे आले की,तेव्हाच मोठमोठी भांडी विकत घ्यायचे आणि त्या भांड्यांवर माझ्या भावांची नावं द्यायचेतीच भांडी आम्ही यासाठी वापरलीमी तिला म्हटलं होतंतू काहीच करू नकोसताटं पाहिजे होतीतीही आम्ही विकत आणलीतेव्हाचे पैसेही मीच दिलेनंतर आमचा व्यवसाय वाढू लागला,तसतसे ते पैसेही तिने चुकते केले,’ असं नेत्रा आवर्जून सांगतातभाजी आणणंती चिरणंआदल्या दिवशीची भाजीची तयारीसुका-ओला मसाला वाटप हे सगळं त्या दोघी मिळून करतातदररोज संध्याकाळी ताजी भाजी आणण्याचा नेम त्यांनी चुकवलेला नाहीचिकनवाला आणि मच्छिवाल्यांचे पैसे रोजच्या रोज दिले जातातत्यांच्या व्यवसायाने आता चांगलाच जम बसवलायरोज किमान ५० जण तरी त्यांच्याकडे हक्काने जेवतातस्वतनेत्रा यांना अधिकचे पैसे मिळताततर शामला यांचे संपूर्ण घरच या व्यवसायावर उभं राहिलंयआता शामला यांचा एक मुलगा दहावीलातर दुसरा आठवीला आहेशामला यांच्यावर इतक्या वर्षांत कोणापुढेही पैशांसाठी हात पसरवण्याची वेळ आली नाहीइतका मानसन्मान या व्यवसायाने त्यांना दिला. 
रस्त्यावर उभं राहून व्यवसाय करणाऱ्या कोणालाही हप्ता चुकलेला नाही.त्यामुळे यापैकी काही महिलांना याबाबत विचारल्यावर ‘आम्ही सांगू शकत नाहीअसं उत्तर काहींनी दिलंतर हप्ते द्यावे लागतातही कबुली देणाऱ्यांनी पोलिसांना की स्थानिक गुंडांनाहे मात्र गुलदस्त्यातच ठेवलं.सध्या या व्यवसायातही स्पर्धा वाढल्याचं त्या सांगतातबीएमसीचा त्रासही अध्येमध्ये होतोयाची कबुलीही त्या देतात.                                                                                         
 संजना रेवाळे आणि दीप्ती वायंगणकर या सख्ख्या शेजारणींनी २०१०मध्ये पोळी-भाजीच्या व्यवसायाला सुरुवात केली संजना स्वतकपडा बाजारात अकाऊंट सेक्शनमध्ये नोकरी करायच्यामात्र त्यांच्या सासूला पॅरालिसिस झाला.त्यावेळी त्या गरोदरही होत्यात्यामुळे नोकरी करताना कसरत होत होती.आईंचे सहा महिन्यांनी निधन झालेघरी सासरे होतेतेव्हा नवऱ्यानेही घरीच राहण्याचा सल्ला दिलामात्र त्यांची शेजारीण त्यांना भागिदारीत पोळी-भाजीचा धंदा करूयाअशी गळ घालू लागली. ‘‘मलाही स्वस्थ बसवत नव्हतंज्यांना नोकरीचीमहिनाअखेरीस येणाऱ्या पैशांची सवय असतेत्यांना घरी बसणं शक्य नसतंत्यामुळे काही ना करायचं हे मनाशी पक्कं ठरवलं होतं.” सुरुवातीला घरचं टीपॉयघरचेच डबे आणि ताटवाट्यांनी सुरुवात झालीपहिल्या दिवशी फार कोणी आलं नाहीमग टाय लावून आलेला ग्रुप आलात्यांना चव आवडलीपहिल्या दिवशी २० जणांचं जेवण बनवलेलंत्यातलं बरंचसं संपलं होतं. ‘‘कापड कंपनीत कामाला असल्यामुळे कधी कधी ग्राहकांना कपडा दाखविण्याचीही वेळ यायचीते कौशल्य मला इथेही उपयोगी पडलंइथेही मी कर्मचाऱ्यांना आग्रहाने बोलवते,” असं संजना सांगतातत्यांच्या व्यवसायाची सुरुवात अवघ्या १०० ते २०० रुपयांपासून झाली आहेजे पैसे साठत गेलेत्यातून टेबलडबे आणि ताटं घेतली गेलीआता त्यांच्या व्यवसायाने जम बसवला असला तरी स्पर्धा खूप वाढलीयेत्यांच्यासारख्या काम करणाऱ्या बायकांची संख्या वाढल्याचं त्या सांगतात. शिवायभुर्जीपाव,सँडविचवालाचायनीजवाला यांचीही स्पर्धा आहेचकाही ग्राहक ठरलेले असले तरी चवबदल हवे असणारे ग्राहकही असतातपण हे केवळ ग्राहक राहिले नसल्याचंही त्या आवर्जून सांगतातत्यांना हक्काने वहिनी,मावशी अशी हाक मारतातकधी बायका-मुलांसोबत असले तर आम्ही या वहिनींकडे जेवतोही ओळखही आवर्जून सांगतात. 
‘‘आम्ही ना दर्जात तडजोड करतना दरात२०१०मध्ये आमच्या राइसप्लेटची जी ५० रुपये किंमत होतीतीच आताही आहेआम्ही सोडा मारत नाहीतेलही चांगलं वापरतो,’ असं त्या मोठ्या अभिमानाने सांगतातइतकंच नव्हे तर त्यांनी भांडी घासण्यासाठी एक महिलाही ठेवली आहेतिला महिना दोन हजार रुपये पगार त्या देतातशिवाय,भाजी कापण्यासाठाही एक मुलगा येतोतसेचएक मैत्रीण त्यांना भाकऱ्या बनवून देतेतिला या एका भाकरीमागे आठ रुपये देतात.त्यामुळे त्या स्वतस्वावलंबी झाल्याचशिवाय एक पाऊल पुढे टाकत त्या इतरांनाही रोजगार देणाऱ्या ठरल्या आहेत.

लोअर परळमध्ये व्यवसाय करणाऱ्या सुनीता पाटीलही या महिलांपैकी एकवयवर्षे ५२... गेली २० वर्षे त्या भुर्जी-पावचपातीअंडभात याचा व्यवसाय करत आहेतत्यांचे पती मोरारजी मिलमध्ये नोकरीस होते.गिरणी बंद पडल्यानंतर त्यांनी घरकाम करण्याचा निर्णय घेतला.घरकामासोबत खाद्यपदार्थ विकावेतअसा विचार करत त्यांनी लहान व्यवसाय सुरू केलात्या डबेही तयार करून देत असतपहाटे चार वाजता त्यांचा दिवस सुरू होईपण या व्यवसायात तितकेसे यश मिळाले नाहीतरी त्या खचल्या नाहीतकमला मिल कंपाऊंडसमोर अनेक बायका हा व्यवसाय करत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं आणि तेथे अंड्याचे पदार्थ कोणीही विकत नसल्याचं समजलंत्यांनी लागलीच हा व्यवसाय करण्याचं ठरवलंसुरुवातीला अंड्याच्या पदार्थांसोबत मासे,चिकनही करून त्या विकत असतनंतर जागेची समस्या निर्माण झाल्याने केवळ अंडाभुर्जीऑम्लेटअंडभात त्या देऊ लागल्याया व्यवसायाच्या जोरावरच त्यांनी तीन मुलांची शिक्षण केलीएका मुलीचं लग्न केलंसारं काही सुरळीत सुरू असतानाच पुन्हा एकदा त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलात्यांचा २८ वर्षाचा उच्चशिक्षित मुलगा एका अपघातात मृत्यू पावलापरंतु पोटाची खळगी भरण्यासाठी पुढे जावंच लागेलया निर्धाराने त्यांनी पुन्हा व्यवसायाकडे पावले वळवलीआता पती आणि दुसऱ्या मुलाच्या मदतीने त्या व्यवसाय करत आहेतया व्यवसायातून आपला संसार सुरळीत सुरू असल्याचं त्या सांगतात.ग्राहकांकडून खूप कौतुक होतंएका इंग्रजी वृत्तपत्रात माझा फोटो छापून आला होता तेव्हा खूप मोठा आनंद झालाअसंही त्या म्हणाल्या.

५६ वर्षांच्या नंदिनी पाटील यांचे पतीही मोरारजी मिलमध्ये कामाला होते.त्यांना अगदी जेमतेम पगार होताकेवळ अडीचशे रुपयांमध्ये घरखर्च चालवावा लागत असेत्यामुळे आधीपासूनच धडपड्या स्वभावाच्या पाटीलबाईंनी स्वयंपाक घरातूनच संसाराला हातभार मिळावायासाठी प्रयत्न सुरू केलेतेलपोळी या कठीण पदार्थांपासूनच त्यांनी श्रीगणेशा केलानंतर समारंभासाठी जेवणदिवाळीचा फराळनाष्त्याचे पदार्थ,याच्या ऑर्डर त्या घेऊ लागल्या आणि हळूहळू या व्यवसायात त्यांचा चांगलाच जम बसलाआर्थिक स्थिती बेताची असताना त्या दिवसाला ३० डबे पोहोचवत असतनंतर चार पैसे मिळू लागलेमुलाचं शिक्षण झालं.तो चांगल्या नोकरीला आहेतरीही पाटीलबाई त्याच उत्साहाने व्यवसाय करतातऑर्डर खूपच कमी केल्या असल्या तरी काम पूर्णपणे बंद केलेलं नाहीस्वत:ला कामात व्यग्र ठेवलं कीअन्य विचार येत नाहीत आणि एक ऊर्जा आपोआपच मिळतेम्हणूनच शक्य आहे तोपर्यंत हे काम करत राहणारअसं त्या सांगतात. 
काही दिवसांपूर्वी Scroll ने रस्त्यावर खाद्यपदार्थ बनवणार्‍या विक्रेत्यांच्या आर्थिक गणिता विषयी एक व्हिडिओ मालिका केली होती. कोणताही धंदा अथवा व्यवसाय नफ्यात नसेलतर तो चालू शकत नाही.इतक्या वर्षांत या महिला आता बऱ्यापैकी नफा मिळवू लागल्या आहेत. मात्र किती पैसे सुटतातया प्रश्नांचं उत्तर मात्र त्या अस्सल व्यापाऱ्यांसारखं हसत हसतच टाळतात.एकूणच चकचकीत आकाशाला टेकलेल्या इमारतींच्या गर्दीत अनेक गोष्टी हरवल्याहातातून निसटल्यापरंतु या टॉवरच्या अध्येमध्ये उभ्या असलेल्या जुन्या इमारतींत राहून या महिला अर्थार्जनासाठी,स्वावलंबनासाठीघर सावरण्यासाठी रांधत आहेत. घराला संकटातून समृद्धीकडे नेत आहेत. यातून त्यांच्याही न नकळत एक संस्कृती जपली जातेय-आत्मीयतेचीजिव्हाळ्याची आणि दुसऱ्याला पोटभर खाऊ घालण्याचीपार्सल काऊंटरफास्ट फूडउच्चभ्रू कॅफेच्या गर्दीत हे चार पायांचे स्टॉल म्हणूनच जवळीक निर्माण करत आहेत.



ऋतुजा सावंत         सुचित्रा  सुर्वे 
ऋतुजा सावंत महाराष्ट्र टाइम्स वृत्तपत्रात वरिष्ठ उपसंपादक पदावर, तर सुचित्रा सुर्वे सहाय्यक वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. दोघींनी महिलांसंबंधी विषयांसोबत अन्य घडामोडींवरही लेखन केले आहे.


Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form