सध्या श्रद्धा वालकरच्या हत्येची घटना गाजते आहे. नुकतीच तिच्या वडिलांची पत्रकार परिषद झाली. त्या निमित्ताने ‘लव्ह जिहाद’ चा मुद्दा देखील चर्चेत आला आहे. त्याच बरोबरीने जवळच्या नात्यांमध्ये होणाऱ्या हिंसेच्या संदर्भातला आणखी एक महत्त्वाचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आलाय! तो म्हणजे - ‘महिलांवर जवळच्या नात्यामध्ये हिंसाचार होतो, तेव्हा अगदी शिकल्यासवरलेल्या महिला देखील त्या हिंसक नात्यामधून बाहेर का पडत नाहीत?’
या प्रश्नाचे वेगवेगळे पैलू मानसोपचारतज्ञ विभा देशपांडे यांनी उलगडून दाखवलेले आहेत.
त्या व्हिडिओची लिंक – त्या हिंसाचार सहन का करतात?
विशेष सूचना - व्हिडिओची क्वालिटी फार चांगली नसली तरी, त्याचा विषय आणि आशय खूप महत्त्वाचा आहे, म्हणून नक्की पहा.